The Guardian Minister gave instructions : रायगड जिल्ह्यातील खालापूर या ठिकाणी असलेल्या ईर्षाळवाडी गावावर दरड कोसळल्याची घटना गांभीर्याने घेत नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने धोकादायक जागांची पाहणी करण्याच्या सूचना केल्या आहेत.
नाशिक शहरातील अमरधाम परिसरात असलेली काझी गढी धोकादायक स्थितीत आहे. यासंदर्भात पूर्वी देखील बैठका घेत उपाय योजणे संदर्भात सूचना दिल्या आहेत. मात्र आज मिळालेल्या माहितीनुसार या विभागात काही रहिवाशी राहत असल्याची माहिती मिळाल्याने महानगरपालिका आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांना जागेवर जावून पाहणी करण्याचे आदेश नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांनी दिले आहेत.
याठिकाणी धोकादायक घरांमध्ये कुणी राहत असल्यास त्यांना इतरत्र हलविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या असून जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्त यांना घटनास्थळी जावून पाहणीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवडी गावावर दरड कोसळली यात 40 ते 50 घरे मातीच्या ढिगाऱ्यात अडकली आहेत. यात १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ९५ जणांना वाचविण्यात आले आहे. या नैसर्गिक अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली, या कुटुबियांच्या तसेच गावाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. घटनास्थळी NDRF च्या टिमसह सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून बचाव कार्य सुरू आहे. मी स्वतः मुख्यमंत्र्यांसह रात्री एक वाजेपासून घटना स्थळी उपस्थित आहे. नाशिक करांनी देखील धोकादायक ठिकाणाहून बाजूला सुरक्षित ठिकाणी थांबावे, मी रात्री जिल्हाधिकारी यांच्याशी बोललो आहे. नागरिकांना काही अडचण असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पालकमंत्री कार्यालय नाशिक या ठिकाणी संपर्क साधावा अस आवाहन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम