Violence increased in Manipur ; जवळपास दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे त्या ठिकाणचे जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झाले असून यातच मणिपूर मध्ये असलेल्या थौबाल जिल्ह्यामध्ये ४ मे रोजी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून यात जमावाने दोन महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावर फिरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मणिपूरमध्ये एका जमावाने दोन महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावर फिरवल आहे. यानंतर त्यांचा भरस्त्यात विनयभंग देखील करण्यात आला तसेच या दोन्ही महिलांना शेतामध्ये नेऊन त्यांच्यावर सामूहिक अत्याचार देखील करण्यात आले असल्याची माहिती एका वृत्त संस्थेकडून देण्यात आली आहे. तसेच या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कारा आणि हत्येचा गुन्हा दाखल केला मात्र दोन महिने उलटून देखील या गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या आरोपींना अटक झालेली नाही. या घटनेचा संताप जनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंडिजिनस ट्राइबल लीडर्स फोरमने गुरुवारी होणाऱ्या निदर्शनासाठी हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यानंतर पोलिसांनी निवेदन जारी करत आपण सदर आरोपींचा शोध घेत असल्याचे स्पष्ट केल आहे.
मणिपूरमध्ये जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो ४ मे रोजीचा आहे. या महिला कुकी समुदायातील असून त्यांच्यासोबत मैतेई समुदायातील लोकांनी छेडछाड करत त्यांची निर्वस्त्र रस्त्यावरून धिंड काढल्याचा आरोप आहे. घटनेच्या २१ दिवसांनंतर या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी IPC कलमातंर्गत १५३ ए, ३९८, ४२७, ४३६, ४४८, ३०२, ३५४, ३६४, ३२६, ३७६, ३४ खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, सदर जमावाने १ माणसाची हत्या केली आहे. तर ३ महिलांना निर्वस्त्र करत त्यांची धिंड काढली. त्यातील १९ वर्षीय युवतीसोबत गँगरेप देखील करण्यात आला आहे. जेव्हा त्या युवतीचा भाऊ तिला सोडवण्यासाठी गेला, तेव्हा त्याला देखील ठार केले गेले. त्यानंतर ३ महिला अज्ञात व्यक्तींच्या मदतीने तिथून पळाल्या असून ४ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास १ हजार लोक एके रायफल्स आणि हत्यारासह फेनोम गावात घुसले. आणि या हिंसक जमावाने अनेक संपत्ती लुटली, घरे जाळली आहेत.
*मणिपूरच्या महिलांसोबत जे झालं ते माफ केले जाणार नाही – मोदी*
या घटनेमुळे संपूर्ण देशामध्ये रोष व्यक्त केला जात आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रतिक्रिया देत म्हटल आहे की, या घटनेने माझं मन दुखी झालं असून रागाने भरल आहे. मणिपूर मधील जी घटना समोर आली ती समाजासाठी लज्जास्पद आहे. असे पाप करणारे, गुन्हा करणारे किती आहेत?कोण आहेत? हे बाजूला ठेवा, मात्र या घटनेने संपूर्ण देशाला मान खाली घालायला लावली आहे. मी संपूर्ण देशवासीयांना विश्वास देऊ इच्छितो, कोणत्याही गुन्हेगाराला सहज सोडलं जाणार नाही. कायदा आपल्या पूर्ण शक्तीनिशी आणि कठोर पावलं या प्रकरणी उचलेल. मणिपूरच्या मुलींसोबत जे काही झालं ते कधीही माफ केलं जाऊ शकत नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल आहे.
*काँग्रेस नेते राहुल गांधी म्हटले*
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरला अराजकतेच्या दरीमध्ये ढकलला आहे मणिपूरमध्ये भारतीय विचारांवर हल्ला होत असताना INDIA (INDIAN NATIONAL DEVELOPMENT INCLUSIVE ALINCE) शांत राहणार नाही आम्ही मणिपूरच्या जनतेसोबत आहोत शांतता हा पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं गांधी यांनी म्हटलं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम