NCP Crisis: नाशिकमध्ये पवार भुजबळ आज आमने सामने

0
42

NCP Crises: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तोफ आज संध्याकाळी नाशिकच्या येवल्यात धडाडणार आहे. त्यापूर्वी शहरातील अनेक ठिकाणी जोरदार बॅनरबाजी करत शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे.

Horoscope Today 08 July : मेष, कुंभ, मीन राशीच्या लोकांमध्ये होऊ शकतो वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी राष्ट्रवादीवर दावा ठोकल्यानंतर छगन भुजबळांनी नाव न घेता थेट शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. शरद पवारांनी भुजबळांच्या टीकेला प्रत्युत्तर न देता थेट येवल्यात जाहीर सभेतून भुजबळांना आव्हान देण्याचा ठरवलं आहे. कारण येवला तालुका हा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.आज सकाळी शरद पवार ठाण्याहून नाशिक आणि त्यानंतर येवल्यात दाखल होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने पवारांसोबत असणार आहे. संध्याकाळी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्यानंतर शरद पवार जाहीर सभेला संबोधित करण्याची शक्यता आहे.

शरद पवारांचे अतिशय निकटवर्तीय आणि विश्वासू नेते मानले जाणारे नेते म्हणजेच छगन भुजबळ. बंडखोरी नंतर शरद पवार आणि भुजबळ प्रथमच आमने सामने येणार आहेत.शिवसेनेतून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री देखील झाले होते. परंतु राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर भुजबळांनी पवारांची साथ सोडली. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे फोडले तेव्हा त्यांनाही त्रास झाला असेलच ना?, असा सवाल केला. त्यानंतर आता शरद पवार थेट येवल्यात शक्तिप्रदर्शन करणार अजेय. संध्याकाळी शरद पवार यांच्या सभेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे अनेक नेते येवल्यातून भुजबळांवर हल्लाबोल करणार आहे. त्यापूर्वी येवल्यात दोन्ही गटांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.

Nashik Crime: नाशिक पुन्हा हादरले घरात घुसून महिलेची हत्या कायदा सुव्यवस्था टांगणीवर

मांजर आडवी गेली तरी सभेला गर्दी होणारच- माणिकराव कोकाटे 

तत्पूर्वी माणिकराव कोकाटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेला गर्दी कमी व्हावी, यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांनी केला आहे.  कितीही मांजरे आडवे गेली तरी सभेला गर्दी होणारच, असा दावाही माणिकराव कोकाटे यांनी केला आहे. त्यामुळं आता शरद पवारांच्या नाशिक आणि येवला दौऱ्यानंतर छगन भुजबळ व माणिकराव कोकाटे यांच्या पुन्हा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here