Nashik Crime : सध्या नाशिक हा गुन्हेगारीचा हॉटस्पॉट बनतोय का? असा प्रश्न उपस्थित होतोय कारण सततच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस यंत्रणेनेचे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठीचे अपयश स्पष्ट होते आहे.
Job Alert :महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या भरतीचा मार्ग मोकळा, पहिल्या टप्प्यात भरली जाणार इतकी पदे
नाशिक मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या भागांत हत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. नाशिकच्या पंक्चर वाल्याच्या हत्येचं प्रकरण संपत नाही तोच आता नाशिकमध्ये एका महिलेची हत्या करण्यात आली आहे.
नाशिक- पुणे महामार्गावरील शिंदे गाव येथे घरात घुसून एका महिलेवर चाकूने प्राणघातक वार केले, यात ही महिला जखमी होऊन मृत्युमुखी पडली त्यामुळे नाशिक पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे जनाबाई शिवाजी बर्डे असे या महिलेचे नाव आहे. या महिलेच्या हत्येनंतर हल्लेखोर फरार झाला होता, मात्र पोलिसांनी तातडीने सूत्र हलवून हल्लेखोराला टोल नाका येथून ताब्यात घेतले, निकिश पवार असे या संशयितांचे नाव सांगण्यात येत आहे.याबाबत नाशिकरोड पोलिसांनी हल्लेखोरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नाशिकरोड परिसरात काही दिवसांपूर्वीच रेल्वेस्थानकावर आश्रित असलेल्या महिलेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती.नाशिक मध्ये गेल्या काही महिन्यात हत्या,दरोडे यांसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीनी डोकं वर काढलं आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था आणि पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारीवरचा वचक कमी झाला आहे का ? असा सवाल उपस्थित होतोय
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम