Murder : किरकोळ वादातून केली मित्राची हत्या……

0
37

किरकोळ कारणावरून आपल्याच मित्राची दुसऱ्या मित्रांना हत्या केली असल्याचा प्रकार डोंबिवली मध्ये घडला आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोघा मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला यावेळी हा वाद विकोपाला गेल्याने संतप्त झालेल्या एका मित्राने आपल्या मित्रावर जवळ असलेल्या चाकूने वार केले यामध्ये शैलेश शीलवंत हा जागीच ठार झाला आहे तर आरोपी किरण शिंदे यांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत मानपाडा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डोंबिवली मधील मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या न्यू कल्याण रोड येथे टाटा पावर हा परिसर आहे. या ठिकाणी शैलेश शीलवंत हा राहत होता. शैलेश रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करायचा याच दरम्यान त्याची आरोपी किरण शिंदे यांच्यासोबत ओळख झाली आणि शनिवारी रात्रीच्या सुमारास दोघेजण बोलत असताना त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद उफाळला, याच वादातून संतप्त झालेल्या किरणने शैलेश ला टाटा पावर परिसरातील एका इमारती जवळ गाठत त्याच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला, यात आपला जीव वाचवण्यासाठी शैलेशने पळ काढला मात्र त्याचा पाठलाग करत रक्तबंबाळ झालेल्या किरणने वार करत त्याला जखमी केले यात शैलेश गंभीर स्वरूपात जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

दरम्यान पोलिसांना घटनेची माहिती मिळताच डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुनील तरमाळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली व तपास सूत्र हाती घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही च्या आधारावर पोलिसांनी किरण शिंदे याची ओळख पटवत त्याला काही तासातच ताब्यात घेतले आहे.

दरम्यान शैलेशला ठार करण्याच नेमकं कारण काय? याचा तपास पोलीस करत आहेत मात्र भरवस्तीत घडलेल्या घटना संपूर्ण टाटा पावर परिसरात भीतीच वातावरण पसरल आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here