द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देशात प्रेमीयुगलांचे आत्महत्या सत्र सुरूच असून यात निष्पाप तरुणाईचा बळी जात आहे, जळगाव जिल्ह्यातील कुंभारी येथे देखील आज अल्पवयीन युवक व युवतीने तासाभराच्या अंतरात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघळकीस आली आहे.
समाज लग्नाला मान्यता देणार नाही या विवेचनेतून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.घटनेचे सर्व बारकावे बघून पोलिस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील कुंभार तांडा (ता. जामनेर) येथील अल्पवयीन युवतीने ९ नोव्हेंबरला घरात कोणी नसताना दुपारच्यावेळी विष पिउन आत्महत्या केली. आई-वडील घरी आल्यानंतर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. १६ वर्षीय युवतीने आत्महत्या केल्याने सर्व्यांना धक्का पसरला असून सर्वत्र दुःखद व चिंतेचे वातावरण आहे.
मुलीच्या आत्महत्येची चर्चा वाऱ्यासारखी पसरली अवघ्या तासाभरातच १७ वर्षीय युवकाने देखील शेतात जावून विष प्राशन करत आत्महत्या केली. युवकाचा मृतदेह शेतातच रात्रभर पडून होता. शोधाशोध सुरू असतांना, दुसऱ्या दिवशी युवकाचा मृतदेह शेतात आढळून आला. तेव्हा सर्वत्र रडबोंबल सुरू झाली. व सर्व गावकरी जमा झाले.
आत्महत्या करण्यापूर्वी मुलाने काकाला msg केलेला होता. दोघांचे प्रेमप्रकरण असल्याची चर्चा गावात आहे. याबाबत पोलिस पाटील किंवा कुटुंबीयांनी पोलिसांना याबाबत माहिती दिलेली नव्हती. गावकऱ्यांनी माहिती दडपण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गावात जावून तपास केला.
आत्महत्या झालेल्या मुलाचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून , मुलीच्या मेहुण्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संदेश पवन याने त्याच्या काकाला पाठवला असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. पोलीस पुढील घटनेचा सखोल तपास करत आहेत.
आत्महत्या झालेल्या कुंभारी येथील घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी केली. चौकशी केली असता दोघे अल्पवयीन असून त्यांनी प्रेमप्रकरणातून विषारी द्रव प्राशन केले व त्यातून आत्महत्या केल्याची चर्चा गावात आहे. चौकशीसाठी दोघांच्या नातेवाइकांना पोलिस ठाण्यात बोलावले असून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या घटना समाजात चिंता वाढवणाऱ्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम