देवळा ; तालुक्यातील उमराणे येथे आज (दि 16) रोजी कत्तलीलासाठी जाणाऱ्या 20 गोवंशाची देवळा पोलिसांच्या दमदार कामगिरीमुळे सुटका झाली आहे .

याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अग्निवीरचे गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार एम एच 12, जी टी 7000 या सहा चाकी वाहनातून 20 गोवंशाची चांदवड मार्गाने उमराणे, सौंदाणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 ने मालेगावच्या दिशेने कत्तलीसाठी बेकायदेशिर वाहतुक होत असल्याच्या आधारे अग्नीवीर हिंदू संघटना, गोरक्षक मच्छिंद्र शिर्के, भुरा सूर्यवंशी, वाल्मीक सैंदाणे, संतोष केंदाळे, चिराग जोशी, गौरव मते यांना राहुड घाटाच्या पायथ्याशी रात्री 02:30 वाजता सदर वाहन चांदवड बाजू कडून भरधाव वेगाने येताना दिसून आले.
यावेळी वाहन चालकाला हात देऊन थांबण्याचा इशारा केला असता त्याने वाहन न थांबवता मालेगावच्या दिशेने नेले. मच्छिंद्र शिर्के यांनी 112 क्रमांकावर माहिती देत देवळा पोलिसांना मदतीची विनंती केली. वाहन चालकाने वाहन उमराणे गावाच्या उड्डाणपुलाखालून मनमाड कडे वळवण्याचा प्रयत्न केला असता टर्न न बसल्याने वाहन चालकाने सदर वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. या ठिकाणी तात्काळ देवळा पोलीस हजर झाले. वाहनाच्या पाठीमागे बघितले असता त्यात 16 गाई व 4 लहान वासरे असे एकूण 20 गोवंश दोरीने तोंड पाय घट्ट बांधून, दाबून कोंबून, निर्दयतेने, जखमी अवस्थेत पोलिसांना व गोरक्षकांना मिळून आले .
त्यानुसार देवळा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरोधात मच्छिंद्र गोविंद शिर्के, रा. नवदुर्गा नगर, कलेक्टर पट्टा, मालेगाव यांच्या फिर्यादी नुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सुमारे रू.3,18,000/- किमतीची गोवंश जनावरे व रु.5,00,000/- किमतीचे सहा चाकी ट्रक वाहन असा रू.8,18,000/- किमतीचा मुद्देमाल देवळा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्य पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुभाष चव्हाण करीत आहेत. दरम्यान, मालेगाव शहरात कत्तलीसाठी गोवंश आणणाऱ्या शेख मुश्रीफ शेख अक्रम, जव्वा सरवार पहिलवान आणि आसिफ वायरमन यांच्यावर कारवाई करण्यात यावी ,अशी मागणी शिर्के यांनी केली आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम