राम शिंदे | सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत सर्वतीर्थ टाकेद शिरेवाडी येथील संत निरंकारी भवन मध्ये बायफ संचालित नाबार्ड व महिंद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या हवामान बदल प्रकल्प अंतर्गत जागतिक माती दिनानिमित्त शेतकरी जनजागृती मेळावा घेण्यात आला.सकाळी दहा वाजता चालु झालेल्या कार्यक्रमात माती परीक्षण, मातीचे महत्व,मातीतून मिळणारी विविध स्वरूपाची पिके,घटक पाणी आणि सजीवसुष्टी साठी महत्वपूर्ण असलेली माती यासंदर्भात अनेक वक्त्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून संजय पाटील (TPE-BAIF), सहयोगी संशोधन संचालक ZARS इगतपुरी हेंमत पाटील, माती शास्त्रज्ञ ZARS जी एस चौरे, प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर, इगतपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस,CPE-BAIF सुधीर वागळे, के डी भोईटे,माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे,टाकेद गावचे सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे, वासाळीचे सरपंच काशिनाथ कोरडे ,आदर्श शेतकरी कैलास वाजे,कृषिरत्न पुरस्कार विजेते जगण घोडे, सरपंच अशोक बोराडे, साहेबराव बांबळे, शेतकरी अनिल वाजे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, जनार्धन शेने,दिलीप पोटकुले आदींसह बहुसंख्य मान्यवर यावेळीं उपस्थित होते.
वनविभागाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जमिनिमुळे डोंगर उतारामुळे मातीचा एक थर तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात, जमिनीत असलेल्या घटकांचे आरोग्य संतुलित राखण्यासाठी पाणी आणि खतांचा योग्य प्रमाणात वापर करून आपण प्रयत्न केले पाहिजे , उन्हाळा, हिवाळा, आणि पावसाळा या तीनही ऋतू प्रमाणे सेंद्रिय खतांचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. नत्र, पोटॅश, पालाश, जस्त, झिंक,फेरस ,असे मार्गदर्शन संजय पाटील यांनी केले.
शेतकऱ्यांच्या पूढे पहिले आम्ही नतमस्तक होऊ,कृषी विद्यापीठ, बायफ अंतर्गत आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उपक्रम राबविले,शेती ही फार बारकाईने करा,वातावरण बदल नुसार शास्त्रीय पद्धतीने पिकांचे नियोजन करणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन हेमंत पाटील यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले.
आदर्श शेतकरी कैलास गोपाळा वाजे, शंकर चोथवे,अनिल वाजे यांनी आपापले मत यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन शिवविख्याते विकास शिरसाठ यांनी केले
बायफचे संजय थेटे, महिंद्राचे संदीप पवार, तुकाराम नांगरे, लालमन गभाले, काळू जोशी, कृषी पर्यवेक्षक किशोर भरते, भाऊसाहेब वाजे, लक्ष्मन जोशी, चिंधु नांगरे, बायफचे पदाधिकारी कर्मचारी यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ शेतकरी यावेळी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम