द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; आपल्याला आयुष्यात यशाचे शिखर गाठायचे असेल तर कठोर परिश्रम, मेहनत घ्यावी लागेल तरच आपण अपेक्षित ध्येय गाठू शकतो असे प्रतिपादन लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी केले.
पंचवटी येथील लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात भूगोल विभाग आयोजित एम. ए. पदुव्युत्तर च्या उजळणी वर्गाच्या आयोजन प्रसंगी अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य जगदाळे यांनी वरील उद्गार काढलेत. आजच्या या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी कायिक , वाचिक, मानसिक, बौद्धिक , शारीरिक इत्यादी दृष्टीकोनातून परिपूर्ण असणे गरजेचे आहे. “प्रयत्न अंती वाळूचे कण रगडीता तेलही गळे” या उक्तीप्रमाणे आपल्याला अथक परिश्रम घ्यावेच लागतील तरच आपले भविष्य उज्ज्वल होईल असेही त्यांनी कथन केले.
भूगोल विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे IQAC समन्वयक डॉ. मृणाल भारद्वाज, उपप्राचार्य डॉ. नंदू पवार, डॉ. विनीत राकिबे, डॉ. संतोष चोबे, नँक समन्वयक डॉ. किशोर निकम, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. राकेश पाटील, जिमखाना समन्वयक डॉ. संतोस पवार, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. हरकर, ग्रंथालय प्रमुख प्रा. संभाजी व्याळीज आदी मान्यवरांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत भूगोल विभग प्रमुख डॉ. प्रल्हाद व्यालीज यांनी केले, शेवटी आभार आभार प्रा. जी. यु. हरकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राकेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भूगोल विभागातील सर्व सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतलेत. यावेळी प्रा. स्वप्नील धात्रक, प्रा. श्रीमती कविता घाटे तसेच सुभाष मांडवडे हे हि उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम