राम शिंदे | सर्वतीर्थ टाकेद
शेतकरी जगलाच तरच देश जगेल हे आपल्याला मान्यच करावं लागेल.आजवरचा राजकीय इतिहास जर बघितलाच अनेक पक्ष संघटना लोकप्रतिनिधी नेते मंडळी आपल्या प्रामाणिक कष्टकरी शेतकरी बांधवांचे भांडवल करून स्वतःचा स्वार्थ साधतांना दिसतात अनेक सरकारे येतात आणि जातात परंतु या शेतकरी बांधवांसाठी कोणताच राजकारणी अथवा लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक झटतांना मात्र दिसत नाही. आणि याच शेतकरी मायबापाची परिस्थिती जाणीवपूर्वक लक्ष्यात घेऊन नाबार्ड आणि महिंद्रा व बायफ संस्थेने स्वतः पुढाकार घेऊन इगतपुरी तालुक्यातील घोडेवाडी येथे स्वतः शेतकरी बांधवांसाठी मार्गदर्शन शिबीर घेत दूध डेअरी केंद्राची निर्मिती करत केला.
नाबार्ड आणि महिंद्रा अँड महिंद्रा पुरस्कृत पूर्ण विकसित एकात्मिक पाणलोट क्षेत्रामध्ये हवामान बदल अनुकूल कार्यक्रम अंतर्गत पांडव पाणलोट क्षेत्र विकास समिती बार शिगवे,लोकसंदेश पाणलोट क्षेत्र विकास समिती सोनोशी,जटायू पाणलोट क्षेत्र विकास समिती मायदरा धानोशी सर्व बायफ कर्मचारी वृंद परदेशवाडी यांच्या वतीने बांबळेवाडी येथे आज दुध संकलन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला नाबार्ड चे जिल्हा प्रतिनिधी अमोल लोहकरे,सी एस आर महिंद्रा अँड महिंद्रा इनाम मुजुमदार,श्री व्ही बी दयासा, सुधीर वागळे, बायफ चे प्रोग्रॅम मॅनेजर सुरेश सहाने, बायफ सिनिअर प्रोजेक्ट अभियंता संदीप पवार, कार्यक्रम अध्यक्ष स्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे होते.
बायफ चे संजय थेटे, अभिजित नवले, अरुण खडांगळे, अक्षय पाटील, मयूर रहाणे,विशाल जाधव,आदर्श शेतकरी जगण घोडे, अतिरिक्त कार्यक्रम समन्वयक मुकुल बाविस्कर, सोमनाथ घाणे, बहिरू केवारे, सोनोशी सरपंच दिलीप पोटकुले, साहेबराव बांबळे, अशोक बोराडे,शंकर चोथवे, उपसरपंच पोपट लहामगे, शेतकरी शिवराम जोशी, रतन बांबळे आदींसह बहुसंख्य शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतकऱ्यांना शेती सोबत जोड व्यवसाय म्हणून दूध उतपादनाकडे बघितले पाहिजे ,आज शेती परवडत नाही म्हणून कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना जोड व्यवसाय म्हणून दूध उत्पादन हे महत्वपूर्ण व खेळते भांडवल ठरत आहे.याच त्यांच्या दुधाला योग्य बाजार भाव,योग्य नियोजन फॅट,योग्य आणि वेळेवर मोबदला देण्यासाठी नाबार्ड आणि महिंद्रा कंपनीच्या वतीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना एकजूट करत दूध डेअरी केंद्राची स्थापना करण्यात येत आहे.यासोबतच आदिवासी तरुणांना रोजगार पण उपलब्ध केल्या जाणार आहे.त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा व्यवसाय वाढवायचा आहे आणि याला एकसाथ पुढे न्यायचे आहे.प्रत्येक शेतकऱ्यांना योग्य भाव व वेळेवर वेतन दिले जाईल. असे मार्गदर्शन नाबार्ड चे अमोल लोहकरे यांनी यावेळी बोलतांना केले.
या कार्यक्रमाप्रसंगी सर्व उपास्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. बायफ चे संजय थेटे यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर रतन बांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर संदीप पवार यांनी आभार प्रदर्शन केले.यानंतर सर्व शेतकरी बांधवांना चहा नास्ता देण्यात आला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम