सिन्नरला किरकोळ वादातून दोन गटात राडा

0
40

द पॉईंट नाऊ: सिन्नर : शहरातील मळहद्द आणि वैदूवाडी परिसरातील दोन गटांमध्ये किरकोळ वादातून हाणामारीची घटना शनिवारी (दि.८) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. यात दोन जण जखमी झाल्याचे समजते. पोलिसांनी घटनास्थळी कुमक वाढवली असून रात्री तणावपूर्ण शांतता होती.

दोन दिवसांपूर्वी नायगाव रोडवर उगले लॉन्सजवळ गाडीला कट मारला म्हणून मळहद्द व वैदूवाडी परिसरातील दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यावरून दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव होता. तथापि, शहराची शांतता अबाधित रहावी यासाठी दोन्ही गटांतील प्रतिष्ठितांनी बैठक घेऊन वाद मिटवायचे ठरवले होते त्यानुसार मळहद्द परिसरातून कार्यकर्ते गावात येत होते. याच दरम्यान गंगावेस परिसरात दोन्ही गटातील काही कार्यकर्ते समोरासमोर आल्याने वादाची ठिणगी पडल्याचेसमजते.

त्यात दोन्ही बाजूंचे १०० ते १५० लोक एकमेकांना भिडल्याचे कळते. यात काही घरांवर दगडफेक झाल्याचेही वृत्त असून या घटनेनंतर परिसरात दहशत निर्माण झाली. या हाणामारीत काहीजण जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचा जबाब घेण्यासाठी सिन्नर पोलीस नाशिककडे रवाना झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेने शहरात दहशतीचे वातावरण पसरले असून सिन्नर एमआयडीसी, वावी पोलिसांसह केंद्रीय राखीव दलाला पाचारण करण्यात आले.

गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, एमआयडीसी पोलीस

ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली तीनही पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. तसेच दोन्ही गटांना शांततेचे आवाहन केले. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्रीय राखीव दलाच्या तुकडीलाही पाचारण करण्यात आले. सुमारे ५० ते ६० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांनी भेट देऊन शांततेचे आवाहन केले. या प्रकरणी गुन्हेगारांविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here