नाशिक: नाशिकची पहाट आज दुर्दैवी झाली असून पहाटे नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर भीषण घटना घडली आहे. मिरची हॉटेलच्या सिग्नलजवळ एका खासगी बसला मोठा अपघात झाला असून यात बस पूर्णतः जळून राख झाली आहे. या दुर्दैवी घटनेत ११ जणांचा मृत्यू तर ३८ जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा अजून वाढण्याची भीती आहे. देशाचे पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्यात आली आहे.
या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून बसला लागलेल्या आगीत मृतांच्या प्रत्येक नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) कडून 2 लाखांची मदत जाहीर झाली तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींचा संपूर्ण खर्च शासन करणार आहे. मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने नाशिक निघाले असून काहीवेळात दाखल होणार आहेत. अपघात झालेल्या स्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अपघातात जखमी झालेल्यां रुग्णांचीची देखील मुख्यमंत्री भेट घेणार आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम