नाशिक ; वादळी पावसामुळे घर पडून तीन ठार, दोन जखमी

0
33

नाशिक : संगमनेर तालुक्यातील मुंजेवाडी अंतर्गत असलेल्या तारामळी वस्ती येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने घर पडून तीन जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही दुर्देवी घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.

अकलापूर गावांतर्गत असलेल्या मुंजेवाडी परिसरातील तारामळीवस्ती येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे घर पडून विठ्ठल भिमाजी दुधवडे (वय ७५), हौसाबाई भिमाजी दुधवडे (वय ६७), साहिल सुभाष दुधवडे (वय १२) हे तिघे जण जागीच ठार झाले. वनिता सुभाष दुधवडे, मंदाबाई विठ्ठल दुधवडे हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

नागरिकांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती घारगाव पोलिसांना देण्यात आली. निरीक्षक सुनील पाटील, आदीनाथ गांधले, संतोष खैरे, गणेश लोंढे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सरपंच आरूण वाघ, भास्कर देवकर, संतोष देवकर, संपत आभाळे, संजू देवकर, दिनकर आभाळे, संतोष गाडेकर, लहू आभाळे, आशोक वाघ, पांडू देवकर, जनार्दन गायकर, संतोष गायकर, रवी गायकर आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांना ढिगार्‍या खालून बाहेर काढण्यात आले.

यामध्ये तीन जागीच ठार झाले, तर दोन गंभीर जखमी झाले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तालुका हादरला आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोके यांनीही घटनास्थळी भेट दिली.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here