द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आज भुजबळ माध्यमानसमोर बोलत होते, यावेळी भुजबळांनी भाजपला फटकारले आहे.
जनतेचे आशीर्वाद सोबत यामुळे निर्दोष मुक्तता झाली. मी तुरुंगात असतांना कार्यकर्त्यांना तोंड द्यावे लागत होते, आमच्यामुळे खाली पहावं लागत ही भावना मनात होती. नाशिक मधील मोर्चा निघाला होता त्यात 12 ते 15 लाख लोक उपस्थित होते. माझ्या अटकेने अनेक सहकार्यांना दुःख झालं होतं. त्यामुळे ही मुक्तता महत्वाची आहे. लोकांच्या हृदयात मी कायम होतो आजही आहे.
पाठीमागे उभे असलेले लोक बघून त्यांचे आशीर्वाद बघून लढायला बळ मिळाले. बाहेर आल्यावर कामाला सुरुवात केली, लोकसभा, विधानसभेत जे व्हायचं ते झालं. आम्ही जनतेसमोर सत्य मांडले, मात्र काही लोक दुखावलेत, मात्र जनतेच प्रेम कमी झालं नाही.
राजकारणात प्रहार झेलण्याची ताकद जास्त हवी, आमच्या मागे इडी ,सीबीआय, अशा यंत्रणा लावल्या जाताय,सत्तेचा गैरवापर वाढला आहे. असा हल्ला केंद्रावर भुजबळांनी केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम