द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : शहरात साध्या वादामधून आणखी एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मुंबई नाका पोलिस हद्दीत भारतनगर येथे मध्यरात्रीच्या सुमारास तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. सागर प्रकाश रावतर (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. नाशिकमध्ये मागील १३ दिवसांतील हा सहावा खून आहे.
पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीप्रमाणे, आरोपी भोये ह्याचे कोरडे नामक मुलीसोबत प्रेमसंबंध होते. सागर रावतर हा नेहमीच त्यांच्या भांडणात मध्यस्थी करून ते मिटवण्याचा प्रयत्न करायचा . या कारणावरून सागरवर शनिवारी मध्यरात्री भारत नगर येथे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यमध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणातील संशयित असलेले भरत भोये, गौतम भोये आणि गणेश भोये यांना मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, हत्या झाल्याची माहिती मिळताच विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे हे सुट्टीवर असल्याने बी. जी. शेखर हे घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणा संबंधी पोलिसांकडून आता अधिक तपास केला जात आहे.
नाशिक शहरात गुन्हेगारांचा काही गेल्या दिवसांपासून धुमाकूळ सुरु आहे. नाशिक शहरातील गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरात गुंडगिरी, टोळ्यांच्या वादातून जीवघेणे हल्ले करणे अशा घटना वाढल्या आहेत. वारंवार होणाऱ्या हत्येच्या घटनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न शहरात निर्माण झाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम