महाबली हनुमंता तुझा जन्म तरी कुठला रे ? मारुतीरायाच्या जन्मस्थळावरून वाद

2
32

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : त्र्यंबकेश्वरात हनुमान जन्मभूमीवरून आता नवीन वाद निर्माण झाल्याची लक्षणे आहेत. हनुमानरायाची जन्मभूमी ही किष्किंधा आहे असा दावा गोविंदानंद सरस्वती महाराजांनी केला तसेच त्र्यंबकेश्वरमधील अंजनेरी ही तपोभूमी आहे असे त्यांनी म्हटलं आहे.

हनुमानाचे जन्मस्थान किष्किंधा की अंजनेरी यासंदर्भात विद्वानांनी लेखी पुरावे मांडाचे असं  त्र्यंबकेश्वराचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी आवाहन केले आहे.

नाशिकातील विद्वानांच्या हनुमान जन्मस्थळावरून मतात भेदाभेद झाल्याने नवीन वादाला तोंड फुटणार असल्याचे चित्र समोर दिसत आहे.

हनुमानाचे जन्मस्थान देशात नक्की कुठे आहे. यावरून देशाच्या उत्तर भागात सध्या मोठा वाद पेटला आहे. देशातील तब्बल ९ ठिकाणी हनुमानाचे जन्मस्थान असल्याचा दावा केला जात आहे. त्याचेच पडसाद नाशिकमध्ये उमटत असताना आहेत. ज्यामुळे एका चर्चेच आयोजन त्र्यंबकेश्वरमध्ये करण्यात आले होते. किष्किंधा येथे गोविंदाचार्यही आले होते. शिवाय इतर काही अभ्यासकांनीही तिथे हजेरी लावली.

तिथे काही जुने संदर्भ सादर करण्यात आले. वाल्मिकी रामायणाचे देखील काही संदर्भ इथे देण्यात आले आणि अजनेरी येथे हनुमानाची जन्मभूमी असल्याचे यातून स्पष्ट झाले. तर, किष्किंधा हीच हनुमानाची जन्मभूमी असल्याचे समोर आले आहे.

अंजनेरी नगरी इथे केवळ तपोभूमी आहे आणि हनुमान तिथे लहानपणी खेळल्याचे संदर्भ मिळाले. याच शास्त्रोक्त चर्चेमुळे नव्या वादाला तोंड फुटत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

2 COMMENTS

  1. व्यवस्तीत लिहा तुम्ही जे काही लिहिलंय ते कळत नाही

    • तुम्ही जे काही लिहिलंय ते कळत नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here