भिवंडी : वाद कशावरून होतील हे सांगता येत नाही, तांदूळ शिजत नाही म्हणून पतीने पत्नीशी वाद घातला. हा वाद विकोपाला जात पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडीत उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पतीला पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.
नेमके काय घडले ?
भिवंडी तालुक्यातील खोणी गावातील भंगार व्यापारी शंकर वाघमारे (23) हे पत्नी ज्योत्स्ना (20) हिच्यासोबत भाड्याच्या घरात राहत होते. वर्षभरापूर्वी त्याचा पत्नी ज्योत्स्ना हिच्याशी विवाह झाला होता. जेवताना पतीने पत्नीला भात शिजवण्यास सांगितले. मात्र तिने भात शिजवला नाही. त्यामुळे दोघांमध्ये वादावादी झाली. हा वाद इतका वाढला की पतीने लाकडी काठीने तिच्या डोक्यावर, पाठीवर आणि पोटावर मारहाण केली यात तिला गंभीर इजा देखील झाली.
पत्नी रक्ताच्या थारोळ्यात, पतीला अटक
घरात लाकडी दांडक्याने हल्ला केल्याने ती जमिनीवर पडल्याने तिचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेतली. हा प्रकार उघडकीस आल्याने सर्वच चक्रावले त्यावेळी पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून शेजाऱ्यांनी पतीला पकडले. घटनेची माहिती निजामपुरा पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी महिलेला इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शंकर वाघमारेला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम