नांदगाव
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढतच असून महाराष्ट्रातील विविध भाग पाण्याखाली गेला आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यासह (Nandgaon) शहरात ढगफुटीसारखा पाऊस रात्री झाला. (Heavy rain in Nandgaon) अचानक आलेल्या पावसामुळे रेल्वे स्थानकातील रुळांवर पाणी साचले होते. (Nandgaon Railway Station) यामुळे काही काळ इथली वाहतूक खोळंबली होती. ही परिस्थिती बघता यंत्रणेची पुरती तारांबळ उडाली आहे.
रात्री झालेल्या पावसाने शहरातील अनेक वस्त्यांत पाणी शिरले. अनेकांचे संसार पाण्यात गेले तर हातावर काम करणाऱ्या रहिवाश्यांचा संसार पाण्याखाली गेला. नांदगावसह जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon), मनमाड (Manmad), नांदगाव (Nandgaon), येवला (Yeola), सटाणा (Satana) भागात पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नांदगाव शहरातून वाहणारी शकांबरी (Shakambari River) आणि लेंडी नदीला (Lendi River) पूर येऊन त्याचे पाणी नदी काठी असलेली बाजारपेठ, दुकाने, घरात पाणी शिरले.
तर वखारी (Wakhari) आणि दरेल (Darel) येथे छोटे बंधारे फुटल्यामुळे त्याचे पाणी अनेक शेतात शिरल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदगाव शहरवासीयांना या पाण्याचा मोठा फटका बसला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम