महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा कट ? तलवारींची आयात वाढली

0
37

महाराष्ट्रात गेल्या १ महिन्यापासून तलवारींचा मोठा साठा पोलिसांकडून जप्त करण्यात येत आहे. कोण मागवतय इतक्या तलवारी ? ह्या मागे नेमक कारण काय ? महाराष्ट्रात घातपात करण्याचा तर हेतू नाही ना ? अशा प्रश्नांना आता वाचा फुटत आहे.

धुळे, औरंगाबाद आणि पिंपरी ह्या महाराष्ट्रातील प्रमुख तीन शहरात शास्त्रांचा हा मोठा साठा महाराष्ट्र पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. आत्तापर्यंत धुळ्यात ८९ , औरंगाबादेत ६५ , तर पिंपरीत एकुण ९७ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यातच औरंगाबाद आणि पिंपरी सारख्या राजकिय आणि सामाजिक दृष्ट्या संवेदनशील असलेल्या जिल्ह्यात घातपात घडवून आणण्याचा हेतू असेल का ? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

२७ एप्रिल २०२२ ला पोलीसांनी मुंबई- आग्रा हायवेवर धुळ्याकडे येणाऱ्या स्कॉरपिओ गाडीची झडती घेतली असता गाडीतून ८९ तलवारी व १ खंजीर जप्त करण्यात आला. या प्रकरणात जालन्यातील ४ आरोपींना अटक करण्यात आली. महाराष्ट्रात तलवारी सापडण्याची ही तिसरी घटना होती. तर चौकशीतून आरोपींनी चित्थोड गड वरून तलवारी घेतल्याचे सामोर आले. तरी ह्या प्रकरणात बाहेरील कुणाचा हात होता की नाही ह्या बाबत सखोल तपास केला जाईल असे धुळे पोलिसांनी सांगितले. ह्या घटनेच्या महिन्याभरा पूर्वी

३० मार्च २०२२ ला औरंगाबादमधील (DTDC) डिटी डिसी कुरीअर कंपनीत रोड ट्रान्सपोर्ट ने तलवारींची पहिली खेप उतरली. रोड ट्रॉन्सपोर्ट मुळे पार्सल स्कॅन झाले नव्हते. तर चौकशीअंतर्गत पोलिसांना त्या तलवारी पंजाबच्या अमृतसर , जालंदर आणि इतर शहरांमधून आयात होत असल्याचे समोर आले. पार्सल वर सांकेतिक भाषेत नावे असल्याचेही पुढे उघड झाले. पोलिसांनी चौकशी नंतर ह्या प्रकरणी चौघांना अटक केली. या घटनेनंतर पंजाबवरून आलेल दुसर संशयीत पार्सल ४ एप्रिल २०२२ ला पिंपरी येथे सापडले. हे पार्सल औरंगाबाद आणि अहमदनगर साठी पाठवण्यात आले होतं ह्या बाबात औरंगाबाद पोलिसांशी चर्चा करता , ” आपल्याकडे तलवार आहे हे दाखण्याच्या उद्देशाने मागवलेले आहेत ” असे कारण समोर आले. तर ” फोटोग्राफी साठी नवरदेवाच्या हातात देण्या साठी म्हणून तलवार मागावली ” अशी शुल्लक करणे पुढे आली आहेत. तर फक्त दिखाव्या साठी म्हणूनही तलवार ऑनालाईन मागवली असे देखील कारण समोर आले. पोलिसांनी आत्तापर्यंत अश्या अनेकांवर कारवाई केली आहे.

महाराष्ट्रात आलेल्या या तलवारी ह्या पंजाब मधून आल्याचे समोर आले. शीख लोक धार्मिक कारणांमुळे तलवारी बाळगतात , तसेच शीख धर्मियांना तलवारी बाळगण्याची कायदेशीर परवानगी आहे. तर देशात इतर लोकांना तलवार बाळगायची झाल्यास तीला परवान्याची गरज असते. शस्त्रास्त्र कायद्यानुसार तलवार शस्त्र मानली जाते त्यामुळे परवाना बंधनकारक असतो. तर परवान्याला दरवर्षी नुतनीकारणाची आवश्यकता असते.

पंजाब येथील अमृतसर येथे तलवारी मोठ्या प्रमाणात बनवल्या जातात आणि देशाच्या इतर भागात त्यांची निर्यात केली जाते. असे सत्य समोर आले. परंतु महाराष्ट्रात अचानक येणाऱ्या तलावारींन मागचं हे गुढ मात्र अजूनही उलगडलेलं नाही.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here