द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : होळीच्या उत्सवात प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत होळीच्या रंगात रंगले असतांनाच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार मात्र आपल्या मतदार संघातील सर्वसामान्यांच्या उत्सवरूपी रंगात न्याहून निघाल्या आहेत. त्यांनी होळी घरी न साजरी करता मतदारसंघात सर्वसामान्य नागरिकांसोबत आनंदोत्सव साजरा करत त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या आहेत.
हिंदू धर्मात होळीला अनन्य साधारण महत्व आहे, होळीच्या शुभेच्छा देतांना डॉ पवार म्हणाल्या की होळीच्या प्रवित्र अग्नीमध्ये माझ्या कष्टकरी नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या सर्व दुःख चिंता जळून जावो, कोरोना चे संकट नष्ट होवो, गोड पुरणपोळी सारखा गोडवा माझ्या बांधवांच्या आयूष्यात येवो हीच होळी पौर्णिमेनिमित्त निमित्त अपेक्षा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ. भारती पवार दिल्लीहून येतांना घरी न जाता मतदारसंघात ग्रामीण महिलांसोबत होळी सण साजरा करत त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या आहेत. पवारांच्या ह्या आपले पणाने नागरिकांनी मात्र समाधान व्यक्त केले आहे. कुठल्याही मंत्रीपदाचा गर्व न बाळगता सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळून स्थानिक महिलांसोबत होळी साजरी केल्याने सर्वसामान्य महिलांचा उत्सव द्विगुणित झाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम