द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय संस्था (SIAC) मुंबईचे, नाशिक विभागाचे संचालक डॉ. मालोजीराव भोसले यांनी आज महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना “महाविद्यलियीन विद्यार्थ्यांचा केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत महाराष्ट्राचा टक्का वाढावा म्हणून राज्य प्रशासकीय व्यवसाय संस्थेची (SIAC) स्थापना करण्यात आली आहे” असे त्यांनी सांगितले.
“या संस्थेतर्फे निवडण्यात आलेल्या UPSCच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते. नाशिक विभागातर्फे या वर्षी ७० प्रवेश आरक्षित असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CET) देऊन आपला प्रवेश निश्चित करावा” असे आवाहन केले. “गरीब हुशार विद्यार्थ्यांना 5 हजार स्टायपेंडही या योजने मार्फत देण्यात येते” असेही त्यांनी नमूद केले.
तत्पूर्वी पमहाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. नंदू पवार यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुस्तक भेट देऊन केले. सर्व पदवी-पदव्युत्तर वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महाविद्यालयाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रचे समन्वयक डॉ. संदीप वाघ यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे एच आर व फायनान्स हेड डॉ. विनीत रकीबे, एकॅडेमीक सुपरवायजर डॉ. संतोष चोबे, डॉ. टी. बी. पवार, प्रा. नेरकर, प्रा.शीतल जाधव, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम