मल्हार हिल कॅम्पसमध्ये महापरीनिर्वाण दिन साजरा

0
35

सटाणा ता. ०६ : भाक्षी (ता.बागलाण) येथील खंडेराव महाराजांच्या गड पायथ्याशी असलेल्या आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलीत मल्हार हिल कँम्पस मधील प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिरमध्ये आज सोम.ता.०६ रोजी महापरीनिर्वाणदिना निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा विकास अधिकारी सुरेश येवला हे होते. मुख्याध्यापक पंकज दातरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना “डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनाअगोदर त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्यांना लोक ‘बोधिसत्व’ मानतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध गुरु होते. त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी ‘महापरिनिर्वाण’ हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे.”असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोठावदे,किरण सोनवणे, नंदकिशोर शेवाळे, शेखर अहिरे, ज्ञानेश्वर सोळूंके, अमोल गातवे, स्वाती दातरे, सारिका शिंदे, विशाखा सोनवणे, हर्षाली मोरे, , पवन नाडेकर, सुजाता पाटील, माधुरी चौधरी, रोहिणी सूर्यवंशी, शैलजा बिरारी,सिंधू पवार, रोहिणी सोनवणे, निर्मला रौंदळ, जागृती नहिरे, रेखा आहिरे, आदींसह शिक्षक व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.शेखर आहिरे यांनी सूत्रसंचालन केले तर गोकुळ दात्रे यांनी आभार मानले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here