द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल वादग्रस्त लिखाण केले आहे. राणेंना वेगवेगळ्या पाच उपमा देण्यात आल्या आहेत. या वादग्रस्त लिखाणावर वेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सामनाच्या संपादकावर कारवाई करा, अशी मागणी नाशिक भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. भाजप आमदार देवयानी फरांदे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह नगरसेवक व इतर पदाधिकारी पोलिस आयुक्तालयात आले त्यावेळी त्यांनी ही मागणी केली.
आज सामनाच्या अग्रलेखाचे होर्डिंग नाशिक शहरात लागले. ते त्वरित हटवावे अशी मागणी भाजपाने केली, पोलिस आयुक्तांना याबाबत कल्पना देऊनही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप देवयानी फरांदे यांनी केला आहे.
कायदा सर्वांना समान आहे तर सामनाच्या संपादकावर वर देखील गुन्हा दाखल करून कारवाई करा अशी मागणी फरांदे यांनी केली. त्याचप्रमाणे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शहरात शिवसेना भाजपा कार्यकर्ते समोरासमोर भिडले होते त्यात दगडफेकीत भाजप कार्यालयाचे नुकसान झाले. दगडफेक करणाऱ्यांना अभय दिले जात असून त्यांना अटक केलेली नाही. त्यांचे मुख्यमंत्री अभिनंदन करत आहेत. त्यामुळे पोलिसांना हाताशी धरून राजकारण होत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम