देवळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

0
35

देवळा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाने भारताची अखंडता अबाधित राहावी म्हणून कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी दिलेल्या बळामुळे त्यांना अभिप्रेत असलेली समता, बंधुता व कायदा सुव्यवस्था टिकवण्याचे कार्य करण्याची संधी मिळाली हे भाग्य समजतो असे प्रतिपादन देवळा पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विक्रांत कचरे यांनी केले. ते सोमवार (दिनांक ६) रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त देवळा येथील आनंद विद्यार्थी आश्रमातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका समोर आयोजित अभिवादन सभे प्रसंगी बोलत होते. यावेळी समाजबांधवांच्या वतीने दलितमित्र भाऊराव अहिरे यांनी इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र यांविषयी डॉ. आंबेडकरांनी केलेले संशोधन व भविष्यातील शेकडो वर्षांच्या उपयोगिता यांविषयी आपले विचार मांडले.

यावेळी पोलिस कॉन्स्टेबल निलेश सावकार, संदीप चौधरी, शरीफ शेख, बाळू पवार, मोरे, चंद्रशेखर भदाणे, तुषार भदाणे, प्रकाश भदाणे, कैलास पवार, विकी पवार, मानवाधिकार संघटनेचे विलास माळी, दिलीप पवार, शिरीष पवार, आदींसह सामाजिक, राजकीय, शैक्षणीक क्षेत्रातील मान्यवर व आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here