अश्विनी भालेराव,
नाशिक प्रतिनिधी : जग पाहण्यासाठी तुम्हाला जगावे लागेल, आणि जगण्यासाठी चांगले आरोग्य असले पाहिजे. त्यासाठी आपण आपले आरोग्य चांगले ठेवायला हवे. आरोग्याची काळजी घ्यायला हवी असे डॉ. निवेदिता पवार यांनी ‘महिलांचे आरोग्य’ विषयावर विवेचन करताना सांगितले. त्या एचपीटी आर्ट्स अँड आरवायके सायन्स महाविद्यालयात ‘विद्यार्थिनी मंच’ आणि ‘विद्यार्थिनींसाठी समुपदेशन केंद्र’ उद्घाटन प्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून विद्यार्थिनींशी संवाद साधत होत्या.
पवार पुढे म्हणाल्या की, सध्याच्या बदलत्या काळात तरुणींनी त्यांच्या आहाराकडे, व्यायाम, सवयी यांकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. ज्यायोगे भविष्यातील आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. लहान मुलींना गर्भाशयाचा कर्करोग होऊ नये म्हणून रुबेला लस द्यायला हवी. मासिकपाळीच्या काळात मुलींनी शारीरिक स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. या काळात पोषक आहार घेणे ही खुप महत्वाचे आहे. याबाबत पालकांनी सुद्धा मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. तसेच डॉ. पवार यांनी विद्यार्थिनींना आरोग्याबाबत काळजी कशी घ्यावी हे विविध उदाहरणांद्वारे सांगितले.
प्राचार्य डॉ.व्ही. एन. सूर्यवंशी यांनी ‘ विद्यार्थिनींसाठी समुपदेशन केंद्राचे उद्घाटन केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्यांनी सांगितले की, विद्यार्थिनी मंच आणि समुपदेशन केंद्राद्वारे विद्यार्थिनींना ज्या समस्या येतात, त्यांना त्या समस्यांवर मात करत असताना मदतीसाठी आम्ही तत्पर आहोत. या उपक्रमाला विद्यार्थिनींनी प्रतिसाद द्यावा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि परिचय विद्यार्थिनी मंच प्रमुख प्रा. अनुराधा अहिरे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. राजश्री कापूरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया सिंग गुप्ता यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. मेधा मंगुरकर केले. यावेळी प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ.प्रणव रत्नपारखी, विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी डॉ. आनंदा खलाणे, विद्यार्थिनी मंच प्रमुख प्रा.अनुराधा अहिरे विद्यार्थिनी आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम