” गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची फसणुक केली . ” – गुणरत्न सदावर्ते

0
29

मुंबई प्रतिनिधी :  वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सोमवारी ९ मे रोजी त्यांच्या नवीन एसटी कर्मचारी संघटनेची घोषणा केली . ” एसटी कष्टकरी जनसंघ ” या त्यांच्या नवीन एसटी कर्मचारी संघटनेची स्थापना करत असताना त्यांनी जय श्रीराम अशी घोषणा देखील दिली. त्यावेळी सदावर्तेंनी महात्मा गांधींची हत्या करणारे नथुराम गोडसे यांचा ” गोडसेजी ” असा उल्लेख केला . 

” गांधीजींनी त्यांच्या शेवटच्या क्षणी श्वास सोडताना हे राम म्हणाल्याचे इतिहासात नमूद आहे . पण ‘ नथूराम  गोडसेजी ‘ यांची न्यायालयात ट्रायल झाली तेव्हा त्यांनी हे स्पष्ट केले होते की गांधीजींनी ‘ हे राम ‘ असे कधीच म्हटले नव्हते ” असे म्हणत ., गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली असून , देशात एक षडयंत्र रचण्याचा प्रयत्न या गांधीवादी राजकारण्यांनकडून केला जात असल्याचे धक्कादायक वक्तव्य ही त्यांनी यावेळी केले . 

       मागील ७० वर्षात कष्टकरी समाजासाठी कोणतेही ठोस काम झालेले नाही . त्यांना न्याय मिळालेला नाही . यापुढे आम्ही कष्टकऱ्यांसाठी लढू , त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढू . मातृभमीसाठी आणि मानवतावाद यातून कष्टकरी कामगारांचा विकास ही आमची भूमिका असेल .असे म्हणत त्यांनी संघटनेची भूमिका मांडली .

” राम जन्मभूमीचे आम्ही वकील होतो. न्यायलाय आम्ही यासाठी लढलो . प्रभू श्री रामचंद्रांचा आशीर्वाद घेऊन आम्ही यापुढे लढणार ” . असे देखील ते म्हणाले . एकंदरीतच गुणरत्न सदावर्तेंनी या संघटनेची स्थापना करत राजकारणात प्रवेश केला असून , मुंबई महानगर पालिकेची व कोणत्याही निवडणूकीत कामगार उतरणार असल्याचा ईशारा ही त्यांनी यावेळी दिला आहे .

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here