कोविड लस घेणार नसाल, तर पेट्रोल अन रेशन ही मिळणार नाही

0
39

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; संपूर्ण भारतभर कोविड च्या लसीकरणाच्या बाबतीत भारताने 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

मात्र अद्यापही बऱ्याच ठिकाणी कोविड लसीकरणाला लोकांचा थंड प्रतिसाद आहे. आता अशा लोकांना लस नाही, तर पेट्रोल-रेशन नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात कोविड लसीकरण वेगात होत असले, तरी नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव सह काही भागात अद्याप देखील लसीकरण संथ गतीने सुरू आहे.

बऱ्याच अंशी लोक लसीकरणाला कंटाळा करत आहेत, वा नाही म्हणत आहेत.

आता अशा लोकांना, अर्थात लस न घेतलेल्या लोकांना पेट्रोल, रेशन न देण्याचा निर्णय नाशिक च्या जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला आहे.

त्यामुळे आता नागरिकांना जर रेशन, पेट्रोल हवे असेल, तर आधी कोविड ची लस घ्यावी लागेल.

कोविड लस नाही, तर पेट्रोल नाही.

नाशिक आधी औरंगाबाद (संभाजीनगर) जिल्ह्यात देखील, जिल्हाधिकाऱ्यांनी असेच आदेश काढले आहेत.

कोरोनाच्या हाहाकाराने सगळीकडे मोठ्या प्रमाणावर हानी झाली. ज्यामुळे युद्ध पातळीवर लस निर्मितीची प्रक्रिया करण्यात येऊन, लस आणल्या गेल्या.

मात्र लस घेण्या बाबत बरेच लोक अद्यापही उदासीन आहेत. कोरोनाचा प्रकोप अद्याप पूर्णपणे थांबलेला नाही.

त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यात दिरंगाई करू नये, असे आवाहन शासना द्वारे वारंवार केले जात आहे.
मात्र तरी देखील नागरिक लस घेण्यात दिरंगाई करत आहेत.

विशेष करून, ग्रामीण भागात याबाबत नागरिक अद्याप देखील पूर्णपणे सहकार्य करत नाही.
कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही.

त्यामुळे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे. अन्यथा, एका मुळे सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात.

लसीकरण वाढवण्यासाठी घर-घर दत्तक उपक्रम शासना द्वारे हाती घेतला जाणार आहे. त्यात जर नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही. तर अशांना कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही.

चीन, रशिया अशा विविध देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप सुरू झाला आहे. त्यामुळे, नागरिकांनी कोणत्याही प्रकारे कंटाळा न करता, लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.

अन्यथा, एका मुळे त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागू शकतात.

दरम्यान, मध्यंतरी कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी देखील लस घेणार नाही. म्हणून म्हटले होते.

अशा प्रकारे लोकांचे प्रबोधन करणारेच जर लसीकरण बाबत उदासीनता दाखवत असतील, तर लोकांनी बोध काय घ्यायचा? असा प्रश्न उपस्थित होतो.

त्यामुळे लोकांनी स्वतः सह कुटुंबाचा देखील विचार करून, लसीकरण करून घ्यावे अन्यथा, शासकीय योजना अशांसाठी बंद होतील.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here