मुकुंद भडंगे (प्रतिनिधी) : लग्न म्हणजे माणसाच्या आयुष्यात एक आनंदाचा क्षण, आजच्या बदलत्या काळात लोकांकडे मुबलक सोई सुविधा असल्याने विवाहाचे स्वरूप बदलत आहे. लग्नात हौसेला मोल नाही म्हणत लाखोंरुपये खर्च केले जात असताना, देवपूर ता. सिन्नर येथील मातोश्री मंगल कार्यालयात बुधवार दि ४ ऑगस्ट रोजी झालेल्या एका पर्यावरण पुरक लग्नात वधू पित्याने नवदाम्पत्यास तीस झाडे आंदण दिली. या लग्नाची चांगलीच चर्चा झाली.
भेंडाळी ता निफाड येथील सुदामराव खालकर यांचा मुलगा चि.तुषारचा विवाह देवपूर ता सिन्नर येथील पोपट गडाख यांची कन्या रोहिणी सोबत संपन्न झाला. या सोहळ्यात वधुपिता पोपट गडाख यांच्याकडून नवदांम्पत्यास तीस फळझाडे आंदण देण्यात आली. ज्यात आंबा, चिंच, जांब, आवळा, चिकू, रामफळ, फणस, सिताफळ ही फळझाडे आहेत. फळझाडे देऊन पर्यावरणपूरक लग्न पार पडले.
शेतकऱ्याच्या जीवनातील नैसर्गिक आणि आर्थिक दुष्काळ निवारणासाठी ही एक संकल्पना म्हणजे लग्न सोहळ्यात वायफट खर्च टाळून पर्यावरण आणि शेतकरी उपयोगाचा शेतमालाचा जास्तीतजास्त वापर करणे हा आहे. या लग्न सोहळ्यात नवदाम्पत्याच्या पालकाकडून नवदांम्पत्यास तीस फळझांडाची भेट दिल्या गेल्याने पर्यावरण पूरक संदेश जात नवीन संकल्पना निर्माण झाली.
या पुढे ही महाराष्ट्रात अनेक पर्यावरण पूरक लग्न या पद्धतीने लागली जावी. पाच पिढ्यांना आर्थिक उत्पन्न सुरू राहते. सोबतच पर्यावरणाचे संतुलनही निर्माण होते. पूर्वी बोळवणीत गाय दिली जायची. आज कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे महत्त्व समजत आहे.
अनेक पिढ्यांना सुख…
झाड लावून बोहल्यावर चढणे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरूवात झाड भेट देऊन किंवा झाड लावून करणे. लग्नात आंदण म्हणून पाच प्रकारचे तीस झाडे आंदण म्हणून दिली तर पुढील काळात ते कुटुंब सुखी राहील. अनेक पिढ्या सुखी राहातील.
सुदाम खालकर
वरपिता,भेंडाळी
कमी झालेलं पर्जन्यमान,कोरोनाच्या काळात समजलेलं ऑक्सिजनचे महत्व या मुळे कन्या रोहिणी हिच्या लग्नात मी ३० झाडे आंदण देण्याचा निर्णय घेतला.
पोपट गडाख
गडाख व खालकर परिवाराचा निर्णय स्वागतार्ह असून प्रत्येकाने असा पायंडा पाडला तर निश्चित आनंददायी असेल.
धोंडीराम रायते
उपसरपंच शिंगवे
वधुपिता
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम