अक्षरब्रह्म प्रकाशनच्या दोन नवीन साहित्यकृतींचे प्रकाशन

0
30

– अश्विनी भालेराव
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : प्रा. डॉ. सायली आचार्य लिखीत ‘व्यक्ती व्यक्त होतो तेव्हा या आत्मकथनाचे प्रकाशन दिगगजांच्या उपस्थितीत करण्यात आले, यावेळी पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिरीष लांडगे, मुख्य अतिथी प्रा. डॉ. वृन्दा भार्गवे, प्रमुख अतिथी एकनाथ पवार, कवी रवींद्र देवरे आदी मान्यवरांनी या आत्मकथनाचे कौतुक केले.

यावेळी बोलतांना डॉ. शिरीष लांडगे म्हणाले की सुरुवातीच्या काळात मर्यादित असलेल्या मराठी आत्मकथांनी आता नवे रुप धारण केले आहे. २०२१ मध्ये आत्मकथांचे स्वरुप बदललेले असले, तरीही व्यक्तीच्या व्यक्त होण्यात बदल झालेला नाही. प्रा. डॉ. सायली आचार्य लिखीत ‘व्यक्ती व्यक्त होतो तेव्हा’ या आत्मकथनातून बदलेल्या आत्मकथांच्या स्वरुपाचे दर्शन होते असे प्रतिपादन सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिरीष लांडगे यांनी केले.

अक्षरब्रह्म पब्लिकेशनतर्फे प्रा. डॉ. सायली आचार्य यांच्या ‘व्यक्ती व्यक्त होते तेव्हा…’ या आत्मकथनाचे आणि कवी रवींद्र देवरे यांच्या ‘कुंकवाखालची जमीन ढवळताना’ या काव्यसंग्रहाचे रविवारी (दि.१२) प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. हा प्रकाशन समारंभ मु. शं. औरंगाबादकर सभागृहात सकाळी ११ वाजता झाला. याप्रसंगी डॉ. लांडगे बोलत होते.

डॉ.लांडगे म्‍हणाले, की ‘व्यक्ती व्यक्त होतो तेव्हा’ या आत्मकथेतून प्रा.डॉ. सायली आचार्य यांनी आपला ४४ वर्षांचा प्रवास आपल्या समोर मांडला आहे. यामध्ये अनेक चढ-उतार आहेत. सत्य सांगण्याचे आव्हान त्यांनी या आत्मकथेतून उत्कृष्टपणे पेलेले आहे. याचबरोबर ‘कुंकवाखालची जमीन ढवळताना’ या काव्यसंग्रहातून माय लेकराचं वेगळं समृध्द विश्व कवी रवींद्र देवरे यांनी वाचकांसमोर आणले आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी प्रा. डॉ. वृन्दा भार्गवे म्हणाल्या, १९७५ ते ८५चे दशक हे खऱ्या अर्थाने महिलांचे दशक होते. या दहा वर्षांत स्त्रीयांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आले. व्यक्ती व्यक्त होतो तेव्हा या आत्मकथनातून पुन्हा एकदा १९व्या शतकात गेल्याची जाणीव होते. मुलांच्या नकळत्या वयात झालेला अन्याय, आत्मवंचना आणि बालपणात उमटलेल्या या घटनांचा व्रण तारुण्यातही कसा उमटतो याची अनुभूती या आत्मकथेतून येते. लेखनामध्ये बालपणीचे अवखळ, आनंदी आणि प्रांजळ मुलीचे दर्शन होते. माणसाला माणूसपण शोधण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘व्यक्ती व्यक्त होतो तेव्हा…’ आहे असे म्हणायला हरकत नाही. आत्मकथेतून साहित्याला सकारात्मक दृष्टीकोन मिळतो आहे. उच्चवर्णीयांमधील विवंचनेचे आत्मकथन यातून होतो. याउलट ‘कुंकवावरील जमीन ढवळतांना‘मधून स्त्री शक्तीचा शोध लागतो. विस्मरण झालेल्या गोष्टी पुन्हा आठवण्याचा प्रयत्न या काव्यसंग्रहातून झाला आहे.

समीक्षात्मक पद्धतीने बोलताना प्रमुख अतिथी एकनाथ पवार म्हणतात की सायली आचार्य यांच्या लिखाणात अनेक अर्थ दडलेले आहे,त्याचा अर्थ जाणून घेतल्यावर त्या व्यक्तीचे दुःख आपल्याला कळून येते. ४४ वर्षाच्या लेखिकेला आत्मकथनातून व्यक्त होत कीर्ती भालेराव ते सायली आचार्य असा प्रवास मांडावा वाटतो यातच कथनाचा मानसशास्त्रीय वेध लक्षात येतो. कथनात सुरुवातीच्या भागात शाळकरी वयात वाट्याला आलेल्या घटना विशेष प्रभाव पाडणाऱ्या आहे. असे ते डॉ. आचार्य यांच्या ‘ व्यक्ती व्यक्त होते तेव्हा…याबद्दल म्हणतात. तर ‘ कुंकवाखालची जमीन ढवळताना ‘ बद्दल ऄकनाथ पवार सांगतात, रवींद्र देवरे यांनी स्त्री जीवनाचा परामर्श कवितेतून विविध अंगाने घेतला आहे.

कवी रवींद्र देवरे यांच्या पोस्टर पोएट्री प्रदर्शनाचे उदघाटन अविराज तायडे यांनी केले. यावेळी अॆकनाथ पवार, कवी प्रकाश होळकर, प्रा. डॉ. नीलम बोकील, सहाय्यक निबंधक सुजय पोटे, पवन अहिरराव, कवी मनोहर विभांडिक, रेश्मा देवरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहा रत्नपारखी यांनी केले. तर आभारप्रदर्शन अक्षता देवरे हिने केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here