द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : सरकार पडणार असे भाकीत भाजपाने अनेकवेळा केले मात्र आता महाविकास आघाडीचे २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, पण ते कसेबसे सावरले. असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. हे 25 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. निवडणुका येऊ द्या, एक एक भाजपच्या वाघोरीत येऊन पडतील, असा सनसनाटी गौप्यस्फोट करत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. रावसाहेब दानवे यांचा वाढदिवस व धुळवड सोबत राजकीय धुळवड देखील त्यांनी उडवून दिली.
नेमके आमदार कोण आहेत असे दानवेना विचारले असता दानवे म्हणाले की , जे आमदार संपर्कात आहेत, त्यांची नावं सांगून मला त्यांची आमदारकी धोक्यात आणायची नाही. पण निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपात प्रवेश करणार आहेत. असे सांगत त्यांनी प्रवेशाचा मुहूर्तही सांगितला आहे. दानवेंच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीच्या चिंतेत भर पडणार का हे बघणे महत्त्वाचे आहे. भाजपच्या संपर्कात असलेले नाराज आमदार कोण याबाबत चर्चा सुरु झाली असून सेनेच्या गोटात मात्र संशयाचे जाळे निर्माण झाले.
संजय राऊत यांनी भाजपचा भगवा रंग भेसळीचा आहे अशी टीका केली होती. यावर बोलताना दानवे म्हटले की भेसळ आमच्यात आहे की त्यांच्यात हे त्यांनी पहावं. पण भेसळीचा अर्थ 2 ते 3 जण एकत्र आले की होते. महाराष्ट्रात ३० वर्ष भाजप-शिवसेनेला एकत्र भगव्यावर आणि अलिकडे मोदींच्या फोटोवर लोकांनी मतदान केले.
आम्हाला सोडून आघाडीत गेले त्यांना जाऊन मिळाले तेव्हाच त्यांचा भगवा रंग संपुष्टात आला. आता हिरव्याचं समर्थन करतात ते. आज राहिलेली इज्जत वाचवण्यासाठी ते भगवा, भगवा करतात. असा टोला दानवेंनी लगावला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम