Solapur : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे. यामुळे आज के. सी.राव यांचा ताफा सोलापूरकडे रवाना झाला असून केसीआर यांच्या दौऱ्यात तेलंगणाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि इतर नेत्यांचा देखील समावेश आहे जवळपास ३०० गाड्यांचा ताफा लवकरच सोलापूरमध्ये दाखल होणार आहे.
सध्या महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी सध्या बीआरएसची वाट पकडली आहे. या पार्श्वभूमिवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येत आले आहेत. या दौऱ्याला विशेष महत्व दिल जात आहे
तेलंगणामधून तब्बल ३०० गाड्यांचा ताफा घेऊन के चंद्रशेखर राव यांची महाराष्ट्रात ग्रैंड एंट्री होत आहे. यावेळी त्यांच्यासोबत बीआरएसचे अनेक नेते हैदराबाद येथून महाराष्ट्रासाठी निघत आहेत. या ताफ्यामध्ये अनेक मंत्री, आमदार, खासदार, कार्यकर्ते यांच्या तब्बल ३०० वाहनांचा समावेश असणार आहे.
सुरवातीला बीआरएसचे नेते धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे ब्रेक घेतील आणि अल्पोपहार करून त्यांचा पहिला मुक्काम सोलापूर येथे असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर येथील एका हॉटेलमध्ये तब्बल ३०० रुम या नेत्यांसाठी बुक करण्यात आल्या आहेत.
केसीआर यांनी मराठवाड्यातील नांदेड मधून महाराष्ट्रामध्ये प्रचाराला सुरूवात केली होती, नांदेड येथे घेतलेल्या सभेत त्यांनी अबकी बार किसानो की सरकार अश्या घोषणा देत शेतकऱ्यांच लक्ष वेधल होत. आता आषाढी एकादशीच्या तोंडावर त्यांनी वारकरी व शेतकऱ्यांवर लक्ष करत हा दौरा आयोजित केला असल्याच बोललं जातं आहे. केसीआर पंढरपूर आणि सोलापूर येथे दाखल होणार असून त्यांच्या या दौऱ्यामध्ये ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम