द पॉईंट नाऊ ब्युरो : राज्यसभा निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे. आणि त्यात राज्यात असलेल्या सहा जागांसाठी आत्तापर्यंत सत्ताधारी महाविकास आघाडीसह भाजपने कंबर कसली आहे. त्यात आता आपले आमदार फुटू नये, यासाठी शिवसेना आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार असून, त्यांच्यावर शिवसैनिक लक्ष ठेवणार आहेत.
निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मात्र ही भेट निष्फळ ठरली. त्यामुळे आता निवडणूक होणार हे निश्चित आहे. आणि त्यात आपले आमदार फुटू नये, यासाठी शिवसेना आपल्या अमादारांना बंद हॉटेलमध्ये ठेवणार आहे. तर या आमदारांवर लक्ष ठेवण्यासाठी शिवसैनिक पहारा देणार आहेत. हॉटेलच्या चारही बाजूंना शिवसेना कार्यकर्त्यांची फौजच तैनात असणार आहे. शिवसेनेच्या आमदारांवर शिवसैनिक लक्ष ठेवणार आहेत. आणि सर्व आमदारांच्या स्वाक्षऱ्या कागदावर घेतल्या जाणार आहेत.
निवडणूक आली की पक्षांना मोठी मोटच बांधावी लागते. त्यात आत्तापर्यंत बऱ्याच निवडणुकांमध्ये आपलेच लोक फुटल्याच्या अनेक वेळा घटना घडल्या आहेत. आणि याच कारणास्तव बहुधा आपल्या आमदारांवरच कोणत्याही पक्षाचा या बाबतीत भरोसा राहिलेला नाही. म्हणूनच की काय, आपले आमदार भाजपला मतदान करू नये, यासाठी शिवसेना आपल्या आमदारांना बंद हॉटेलमध्ये ठेवणार आहे. आता यापुढे नेमके काय चित्र निर्माण होते, हे लवकरच स्पष्ट होईल
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम