Mumbai : आज बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ असलेल्या पिपळखुटा येथे झालेल्या बस अपघातावर राजकीय वातावरण तापल्याचं बघायला मिळालं. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या अपघातावरून राज्य शासनावर टीकास्त्र सोडल आहे. जो या अपघातात मृत पावतो तो देवेंद्र वासी होतो असं लोक सांगतात असं म्हणत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत. सातत्याने या ठिकाणी अपघात होतात आणि गेल्या काही महिन्यात या ठिकाणच्या अपघातात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मी स्वतः देखील या रस्त्याने गेलोय, तिथे लोकांना त्यांचा अनुभव विचारला तर लोक या ठिकाणी सातत्याने अपघात बघायला मिळतात जो या अपघातात मृत पावतो तो “देवेंद्र वासी” होतो असं लोक सांगतात. याचं कारण म्हणजे रस्त्याचं काम शास्त्रीय पद्धतीने झालं नसावं ज्यांनी रस्त्यांचे नियोजन केलं आणि रस्ता तयार केला त्यांना हे लोक दोषी ठरवत असतात. जे झालं ते वाईट झालं.
दरम्यान राज्य शासनाने मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत घोषित केली मात्र पाच लाख मदत देऊन प्रश्न सुटत नाही असं म्हणत त्यांनी असे अपघात पुन्हा होऊ नये यासाठी तज्ञ लोकांची समिती तयार करण्याची मागणी केली आहे. तसेच रस्त्याची कमतरता शोधून काढावी आणि अपघात थांबवावे, रस्त्यावर खुणा बघायला मिळत नाही, सलग रस्ता आहे यामुळे वाहन चालवताना काही गोष्टी लक्षात येत नाही असं काही लोकांचं म्हणणं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. तर या अपघातानंतर आता समिती नेमून त्याचा नीट अभ्यास करून लवकरात लवकर उपाययोजना करण्यात याव्यात असं मत त्यांनी व्यक्त केल आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम