Raj Thakrey : आज राज्याचा दिगू टिपणीस झाला…..

0
56

काही वेळापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह जवळपास राष्ट्रवादीच्या मतंबर नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे राज्यातील राजकारण क्षणार्धात बदलल आहे. राज्यातील राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठे फेरबदल झालेत, यावरच राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आज राज्याचा सिंहासन सिनेमातील ‘दिगू टिपणीस’ झाला असं म्हणत राज्याच्या राजकारणावर आपलं मत व्यक्त केल आहे.

 

आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .

उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !

तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.

ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.

बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here