नाशिक : शेतकरी अतिवृषटीमुळे हताश झालेला आता कुठे सावरत असून पुढील कामाची लगबग सुरू असताना जिल्ह्यात आज पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून वातावरणात प्रचंड बदल झाले असून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सलग दुसऱ्या दिवशी सांयकाळी काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. या पावसामुळे मकाचे काढलेले पीक, उन्हाळी कांद्याचे रोप तसेच द्राक्षबागाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकरी देव पाण्यात ठेवून बसला आहे.
दिंडोरी व देवळा तालुक्यात काल काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला असून आज दिंडोरी तालुक्याच्या अनेक भागामध्ये जोरदार पाऊस झाला. रात्री उशिरा देवळा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून या पावसामुळे गहू, हरबरा, पिकांची पेरणी लांबणार आहे. कसमादे परिसरात कांदे लागवडीची लगबग सुरू आहे यास देखील विलंब होण्याची शक्यता आहे. तसेच उशिरा छाटलेल्या द्राक्षबागाना धोका निर्माण झाला आहे.
पावसामुळे टोमॅटो उत्पादक तसेच द्राक्षबागामध्ये फुलॉरो अवस्थेत असणा-या बागामध्ये मणीगळ, घडकुज, तसेच डावणी, भुरी रोगाची लागण होऊन फवारणीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वधारली आहे.
नाशिक जिल्ह्यात द्राक्षबाग लवकर छाटणी झालेल्या द्राक्षबागाना कॅक्रिंगचा धोका निर्माण झाला असल्याने द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे त्यांच प्रमाणे कांदा रोपाचे नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम