औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी कडून शिंदे – फडणवीस सरकार विरुद्ध आंदोलन

0
36

आज औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर राष्ट्रवादी कडून शिंदे – फडणवीस सरकार विरुद्ध आंदोलन करण्यात आले. सुमारे ११ वाजता राष्ट्रवादी जिल्हा कमिटी च्या वतीने घोषणाबाजी करत हे आंदोलन सुरु केले. आंदोलन राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला. काही पदाधिकारी ‘पन्नास खोके एकदम ओके’ असे टी शर्ट परिधान करून आले होते. तसेच आंदोलनादरम्यान पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळाला. ‘या सरकारचे करायचं काय, खाली मुंडके वरती पाय’,’राज्यपालांची हकालपट्टी झालीच पाहिजे’, अशा घोषणा पदाधिकारी आंदोलनामध्ये देत होते.वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, वाढता भ्रष्टाचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि महिलांचा होणारा अपमान या मुद्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते.

आंदोलनाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहे-
– शेतकऱ्यांना पीक विमा मोबदला अपेक्षेप्रमाणे दिला पाहिजे.
– शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा करून त्यांना बिलमाफी दिली पाहिजे.
– ‘लम्पी’ या आजारामुळे दगावलेल्या जनावरांचा मोबदला सर्व शेतकऱ्यांना द्यावा. या आजारावरील लसीकरण देखील विनामूल्य करा.
— महाराष्ट्रातील महिलांवर होणारे अत्याचार न होण्यासाठी कडक बंदोबस्त केला पाहिजे.
– राज्यातील अनेक उद्योग गुजरातला गेले आहेत.
– देशातील महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
– बेरोजगारीमुळे तरुणांची आत्महत्या वाढत चालली आहे.
– राज्यपालांनी छत्रपतींचा अपमान केला आहे त्यांच्या विरोधात कारवाई करा.
– राज्यातील पोलीस भरती प्रकरणी खूप गोंधळ सुरु आहे त्यावरील उपाय .
– राज्यात गोवारने घातलेल्या थैमानावर उपाययोजना करा.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here