Political | भुसे, कुल यांना नोटीस पाठवताना ईडीची शाई संपते का?

0
48
Political
Political

Political |   गेल्या काही दिवसांत शिवसेना ठाकरे गटाच्या तीन नेत्यांवर तर, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एका नेत्यावर ईडीची धाड पडली आहे. आज आमदार रवींद्र वायकर यांची इडि चौकशी असून, यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,”१२ -१३ वर्षांपूर्वीच्या लहान सहान गोष्टी काढायच्या आणि २ -५ लाखांसाठी नेत्यांची चौकशी करायची.

ईडी ही आता भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रांच बनली आहे. जे विरोधी गटातील नेते भाजपसोबत जात नाही. त्यांना हे असं त्रास देण्याचं काम सुरू आहे. आमच्या विरोधी पक्षातील नेत्यांवर राजकीय सूडातून ही कारवाई केली जात असून, भाजपसोबत गेल्यास कारवाई बंद केली जाते. हे चित्र देशासाठी आणि लोकशाहीसाठी चांगलं नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Shantigiri Maharaj | शांतीगिरी महाराज नाशिकमधून लढवणार लोकसभा निवडणुक..?

Political | दादा भुसे, राहुल कुल यांना नोटीस का नाही?

यावेळी राऊत यांनी अनेक नेत्यांवर निशाणा साधला असून, ते म्हणाले की “हा जो मुलुंडचा एक माणूस पोपटलाल आहे. त्याने आयएनएस विक्रांत बचावच्या नावाखाली ‘क्राऊड फंडिंग’ करून कित्येक कोटी रुपये गोळा केले आहेत.  त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि खालच्या कोर्टाने त्याला व त्याच्या मुलाला जामीन नाकारल्यानंतर ते भूमीगत झाले. नंतर त्यांनी जामीन मॅनेज केला आणि त्यांचे सरकार आल्यावर त्यांच्यावरील एफआयआर देखील काढून टाकण्यात आला. मग हा मुलंडचा पोपटलाल मोकळा कसा? असा खोचक सवाल करत राऊतांनी किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला. (Political)

यानंतर त्यांनी अजित पवारांसह मंत्री भूसेंनाही घेरले. राऊत म्हणले की, “अजित पवारांचा ७० हजार घोटाळा, शिखर घोटाळा हे तर पंतप्रधान सांगतातच. मग दादा भुसे, राहुल कुल यांना नोटीस का नाही पाठवल्या? त्यांना नोटीस पाठवताना काय ईडीची शाई संपते का ? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Maratha Reservation | आता मराठ्यांनी ‘एक ओबीसी, लाख ओबीसी म्हणावं…

फासावर लटकावायचं असेल तर लटकवा… 

भाजपसोबत जाण्यास नकार दिला की, ईडी चौकशी आणि एकडा तुम्ही भाजपासोबत गेलात की सगळी चौकशी बंद होते. ही संपूर्ण कारवाई राजकीय सूडबुद्धीतून चालू आहे. पण आमच्यासारखी माणसं यांच्यापुढे कधीही झुकणार नाहीत. टाका ना तुरुंगात, एकदा तर टाकून झालंच आहे. आता परत टाका किती दिवस टाकणार?, फासावर जरी  लटकावायचं असेल तरी लटकवा. देशातील हुकूमशाहीच्या विरोधात आम्ही लढत आहोत. आता आम्ही मागे हटणार नाही” असा इशारा यावेळी त्यांनी दिला.(Political)

हा सर्वात मोठा फ्रॉड

राहूल नार्वेकर यांची ‘राजकीय पक्षांतर बंदी कायदा’ समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याच्या निर्णयावर खासदार राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, “हा तर या देशातील आताचा सर्वात मोठा फ्रॉड आहे.’ ज्या माणसाने आत्तापर्यंत तब्बल १० पक्षांतरं केली आहेत आणि ते सहज पचवून ढेकर दिली आहे. ज्या व्यक्तीने शिवसेनेच्या फुटीलाही मान्यता दिली, अशा व्यक्तीची राजकीय पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी निवड होत असल्यास तो महान माणूस आहे, अशी बोचरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.(Political)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here