कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, राज ठाकरेंनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

0
10

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या पत्रात सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा दिला आहे.राज ठाकरेंनी भोंग्याच्या प्रकारावरून मनसे कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या धरपकडीवर आक्रमक भूमीका घेतली आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात लिहिले, “भोंगे उतरवा आंदोलनावरून महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे. मला प्रश्न पडलाय की, मशिदीमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी ‘धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का?”, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले, महाराष्ट्र राज्य सरकारअंगात आल्यासारखं वागत आहे. आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे शोधत आहेत. जसे की ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले रझाकार आहेत! अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत, असा सवाल देखील केला.

समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. तब्बल 28 हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या अनेकांना तडीपार केलं, तुरुंगात डांबलं.राज्य सरकारला माझे एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही! शब्दात राज ठाकरे यांनी आपल्या पत्रातून उद्धव ठाकरे यांना कठोर शब्दांत सुनावले.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here