द पॉईंट नाऊ ब्युरो : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांना 3 मार्च पर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाब मलिक यांना बुधवारी ईडीने ताब्यात घेतले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांना बुधवारी ईडीने मनी लॉंड्रीग प्रकरणी भल्या पहाटे घरी जाऊन ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना ईडीच्या कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान मलिक यांना बुधवारी अटक करण्यात आल्यानंतर त्यांची 8 तास चौकशी करण्यात आली होती. मलिक यांनी अटक झाल्यानंतर आपला मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने हा राजीनामा घेतला नाही.
मलिक यांना अटक झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका करत, समोरासमोर लढण्याचे बळ नसल्याने या प्रकारे मागून वार केल्याचे म्हटले होते.
आता मलिक यांबाबत 3 मार्च नंतर अजून काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम