Suhas kande | मराठा अरक्षणानंतर आता दुष्काळाच्या विषयावरून राज्यात राजकारण सुरू आहे. शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आपल्या मतदार संघाचे नाव नसल्याने आता नाशिक जिल्ह्यात वातावरण तापले आहे. या विषयावर आमदार सुहास कांदेंना विरोधकांकडून अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे.
दुष्काळाच्या झळा ह्या तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसत आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई अनेक भागात भासत आहे. आतापासूनच अनेक गावांना टँकरने पाणी पुरविले जात आहे.
त्यामुळे पीकविम्याची भरपाई, पाणी, रोजगार आणि दुष्काळाच्या झळा ह्या राज्यातील समस्यांवर काल राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे आंदोलन केले. दरम्यान, आज शिवसेना ठाकरे गट याविषयावर आंदोलनात उतरणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी आमदार सुहास कांदे यांना ह्या विषयावरून घेरण्याची चांगलीच तयारी केली असल्याचे दिसत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम