Maratha Reservation | मराठ्यांच्या ४ महीने २८ दिवसांच्या संघर्षाला यश

0
52
Maratha Reservation
Maratha Reservation

Maratha Reservation | आज  मराठा समाजाचा ४ महीने आणि २८ दिवसांचा संघर्ष हा आज संपला. काल शिष्टमंडळ हे मनोज जरांगे यांना सुधारित जीआरसह भेटले. त्यात सुधारणा करून काल रात्री शिष्टमंडळ पुन्हा मनोज जरांगे यांना भेटले आणि रातोरात अध्यादेश काढले. या माध्यमातून मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. दरम्यान, आता मनोज जरांगे यांनी वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडले.

मी दिलेला शब्द पाळला… 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,”मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने मराठा समाजाला शब्द दिला होता. तो शब्द आज मी पूर्ण केला, अशी भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच यानंतर त्यांनी जरांगे पाटील यांचे कौतुक केले. त्यावेळी ते म्हणाले की,”मराठा संघर्ष नेता मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन करतो” तसेच यावेळी मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हेही मागे घेण्याचा शब्दही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला. (Maratha Reservation)

Maratha Reservation | अन् मराठे जिंकले; रातोरात निघाले अध्यादेश…

वाशी येथे मराठ्यांची विजयी सभा 

आज नवी मुंबई येथील वाशी येथे मराठा समाजाची विजयी सभा पार पडली. वाशी येथील एपीएमसी मार्केट आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पार पडली. यावेळी मराठ्यांनी विजयी गुलाल उधळला. यावेळी मनोज जरांगे बोलताना म्हणाले की,”या विजयी गुलालाचा मान राखा. जर अध्यादेशाला काही धोका निर्माण झाला. तर, सर्वात आधी मी आझाद मैदान गाठेल. यावेळी मनोज जरांगे यांनी शाल आणि तलवार देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तर, शिंदेंनी तलवार उचलत उपस्थितांना अभिवादन केले. (Maratha Reservation)

Manoj Jarange Mumbai | मराठा समाजाच्या ‘या’ मागण्या मान्य

Maratha Reservation | ओबीसीच्या सर्व सवलती दिल्या

तसेच यावेळी सुधारित अध्यादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना सुपूर्द केला. तसेच यावेळी मनोज जरांगे यांना विजयी गुलाल लावत त्यांनी मराठा समाजाचे अभिनंदन केले आणि जरांगे यांचे संघर्ष नेता असा उल्लेख केला. तसेच यावेळी शिंदे यांनी “मराठा समाजाला जोपर्यंत कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत त्यांना ओबीसीच्या सर्व सवलती दिल्या जातील, असे जाहीर केले.

मात्र, यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यावर टीका करत म्हटले आहे की,”हा जीआर नसून फक्त मसुदा आहे. यावर उद्या ओबीसी समाज आपली भूमिका मांडेल, असेही भुजबळ यावेळी म्हणाले. सगे सोयरे हे आरक्षणाच्या चौकटीत टिकणार नाही असेही यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले. (Maratha Reservation)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here