देवळा ; कळवण तालुक्यातील पश्चिम पट्यात गेल्या तिन चार दिवसांपासून पावसाच्या संतधारेने चणकापूर व पुनंद प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात जोरदार हजेरी लावल्याने गिरणा नदीच्या पाण्याच्या पातळीत आज पहाटे पासूनच प्रचंड वाढ झाली. सोमवारी (दि. 11) रोजी गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने पाण्याची आवक वाढली असून , चनकापूर धरणातून 18539 क्यु.व पुनद धरणातून 2442 क्यु. तसेच ठेंगोडा बंधारा वरुन 17010 क्यु. इतका विसर्ग गिरणा नदीपात्रात सुरु झाला आहे. पावसाचा जोर टिकून राहिल्यास 2.00 वाजेपर्यंत पाण्याची आवक वाढून विसर्ग 25000 क्यु वाढण्याची शक्यता आहे . नदी काठच्या गावकर्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .अशी मागणी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी दिली .

चणकापूर ३०१९८,पुनद ९५७४ मधुन ४० हजाराहून अधिक क्युसेसने पूरपाणी गिरणा व पुनद नदीपात्रात सोडण्यात आल्याने गेल्या सात ते आठ वर्ष्यातनंतर पहिल्यांदा नदीला प्रचंड पाणी आल्याचे नागरिक सांगत होते. सकाळी आठ वाजता हा पूल पाण्याखाली गेला आहे.
हजारो क्युसेस पाणी विसर्ग व छोटे मोठे नाले भरून वाहत असल्याने गिरणा नदीवरील पाळे ,एकलहरे ता कळवण व सावकी हे पुल आज दिवसभर पाण्याखाली राहणार असल्याची शक्यता आहे. तालुक्यातील
खामखेडा,भउर ,सावकी व विठेवाडी गावांच्या नदी लगतच्या शेकडो एकरात नदीचे पाणी घुसले.विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने देवळ्याचे तहसिलदार विजय सूर्यवंशी, नायब तहसीलदार विजय बनसोडे यांनी लोहोणेर, सावकी येथे भेट देत पाहणी केली. व रहादारी साठी पूल बंद करत नियंत्रण ठेवले आहे.
चणकापूर व पुनंद धरणातून मोठ्या प्रमाणात पूरपाणी सोडण्यात आल्याने नदीकाठावरील गावांना पूरपाण्याचा फटका बसनार असून शेती व शेतीपिकांचे नुकसान होनार आहे. गिरणा, पुनंद या नद्यांना आलेला पूर पाहण्यासाठी गांगवण, बिजोरे, भादवण, पिळकोस,भउर,खामखेडा, सावकी ,विठेवाडी गावातील नागरिकांनी सकाळी नदीपात्रालगत पूर पाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम