Gram Panchayat Strike | आधीच जुन्या पेन्शनच्या योजनेसाठी संपावर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या आंदोलन सुरू असतानाच तोच आता राज्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, अतिरिक्त कर्मचारी, ग्रामपंचायतींचे संगणक परिचालक यांनी देखील संपावर जाण्याच्या इशारा दिला असल्याने आता यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी आणखी वाढणार आहे.
दि. १८ ते २० डिसेंबर या काळात संपूर्ण राज्यभरातील ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी तसेच संगणक परिचालक यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी तीन दिवसीय कामबंद आंदोलन पुकारले आहे. सोबतच, हे कर्मचारी आपापल्या पंचायत समित्यांसमोर आंदोलनही करणार आहेत. दरम्यान, या कामबंद आंदोलनात संपूर्ण राज्यातील तब्बल २७ हजार ग्रामपंचायती तसेच ६० हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्यअध्यक्ष विलास कुमरवार यांनी दिलेली आहे.
Sudhakar Badgujar | सुधाभाऊंचा करेक्ट कार्यक्रम राजकीय सुडापोटी की कर्माने ?; वाचा सविस्तर
सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामुळे राज्यातील विविध संघटनांनी आपापल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, यामुळे नागपूर येथील विधानभवनावर अनेक संघटनांचे आंदोलनं येत आहेत. तर, काही शासकीय संघटनांचे राज्यभरात काम बंद आंदोलन सुरू आहे.
दरम्यान, यातच आता भर म्हणून आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय सरपंच, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ, ग्रामरोजगार सेवक संघटना, संगणक परिचालक संघटना ह्या संघटनांनी आजपासून पुढील तीन दिवस काम बंद आंदोलन करणार असल्याचे जाहिर केले आहे. दरम्यान, यामुळे आता राज्यातील ग्रामपंचायतींचा कारभार हा आजपासून ठप्प होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Trimbakeshwar | अधिकारी-मंत्र्यांनीच आता सिंहस्थाचे शाहीस्नान करावे; साधू-महंत भडकले
अशा आहेत मागण्या | (Gram Panchayat Strike)
१. सरपंच, उपसरपंच यांचे आजपर्यंत थकीत असलेले मानधन तातडीने अदा करावेत.
२. तसेच त्यांच्या मानधनात वाढ करावी.
३. मानधनाची पूर्ण रक्कम ही सरकारनेच द्यावी.
४. शुल्लक कारणांवरुन कामावरून काढलेल्या ग्रामरोजगार सेवकांना पुन्हा कामावर घ्यावे.
५. ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांना नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा व वेतन द्यावे.
६. निवृत्ती वेतन लागू करावे तसेच उपदान लागू करण्यात यावे.
७. भविष्य निर्वाह निधीची रक्कम इपीएफ कार्यालयात जमा करावी.
८. सोबतच संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सर्व ग्रामपंचायती ह्या पुढील तीन दिवस काम बंद आंदोलन करणार आहेत.
यापेक्षाही तीव्र आंदोलन
दरम्यान, ग्रामपंचयातींच्या ह्या राज्यव्यापी काम बंद आंदोलनात सर्व प्रमुख संघटणांसोबतच गावपातळी वारीलही सर्व संघटनांचा ह्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. पुढील तीन दिवस काम बंद करणार असून, या नंतरही आमच्या मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे अध्यक्ष विलास कुमरवार यांनी दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम