सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | आजच्या पिढीला संस्कारांची गरज असून, पैसा प्रतिष्ठा आहे. पण संस्कार कमी पडत आहेत. दिवसेंदिवस वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली शिवाजी महाराजांनी आपल्या आईचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले, असे प्रतिपादन युवा शिव व्याख्याते आशिष पगार यांनी खर्डे येथे केले. शिवजयंती निमित्ताने खर्डे (ता. देवळा) येथील इंदिरा गांधी विद्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले असून, यावेळी ते बोलत होते. सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले.(Deola)
यावेळी पगार पुढे म्हणाले कि, “सोन्याने भरलेल्या मोहरांचा पिशव्या हातात असताना मोहरा हडप करण्याची लालसा त्यांच्या मावळ्यांना निर्माण झाली नाही. आपल्या परिसरातील कन्हेर गडाचा इतिहास सांगताना पुन्हा तो इतिहास जिवंत केला. दिलेरखानाच्या तीस हजार सैन्यापुढे रामजी पांगेराव व त्यांच्या सातशे मावळ्यांनी निकाराची लढत देऊन शत्रूला हरवून किल्ला शाबूत राखला. त्या काळात मावळे मरणाला घाबरत नव्हते कारण मावळ्यांना विश्वास होता की, आम्ही नसताना आमच्या परिवाराला सांभाळणारा आमचा राजा आहे.
Deola | खालप येथे शुक्रवारपासून खंडेराव महाराज यात्रोत्सव
स्वदेशीचा पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला व छत्रपती शिवरायांनी तयार केलेला महाराष्ट्र कसा होता हे विद्यार्थ्यां पुढे मांडले. ह्या विद्यालयाचे प्राचार्य दिलीप रणधीर हे माझे गुरु असून त्यांनी आम्हाला घडविले म्हणून आम्ही घडलो असे सांगितले. याप्रसंगी प्राचार्य रणधीर यांनी छत्रपती शिवाजी महाराज ही एक व्यक्ती नसून एक विचार आहे असे सांगितले. आशिष पगार हा माझा विद्यार्थी असून तो अगदी माध्यमिक शाळे पासूनच विविध कार्यक्रमात भाषणात भाग घेत असे.(Deola)
आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना आत्मविश्वास येऊन त्यांनीही अशिष सारखे वक्ते व्हावे म्हणून आपल्या पुढे अशिषला आणले आहे. जडणघडण माध्यमिक शिळेतच ख-या अर्थाने झाली असे रणधीर म्हणाले. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकर देवरे, उपसरपंच सुनील जाधव, पोलीस पाटील भारत जगताप, राहुल देवरे आदींसह शिवप्रेमी नागरिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Deola)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम