धुळे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 साली आणलेल्या नोटबंदीला लवकरच सात वर्ष पुर्ण होणार आहेत. तसेच गेल्या काहीदिवसांपुर्वी रिजर्व बँकेनेही दोन हजाराच्या नोटा बंद केलेल्या आहेत. मात्र आता लवकरच 500 चीही नोट बंद होईल अशी शक्यता देशातील बड्या नेत्याने वर्तवलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना ऊधान आलेलं आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर हे आदिवासी एल्गार परिषदेनिमित्ताने धुळे शहरात आलेले होते. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीकादेखील केली. ते म्हणाले की, 2024 च्या निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा नोटबंदी होईल. त्यामुळे ज्यांच्याकडे पाचशे रुपयांच्या नोटा आहेत त्यांनी ते पैसे शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटांमध्ये बदलुन घ्याव्यात.
NMC Hospital Recruitment | दुसऱ्या दिवशीही डॉक्टरांचा प्रतिसाद नाहीच! कारण नक्की काय?
एवढचं नव्हे तर आंबेडकर यांनी दंगल होण्याची भीतीही व्यक्त केली आहे. ज्याप्रमाणे पॅलेस्टाईन मध्ये सध्या घमासान युद्ध सुरू आहे. तशाच प्रकारे भारतात देखील घमासान युद्ध येणाऱ्या काळात आरएसएस आणि भाजप जाती-जातीच्या आरक्षणाच्या नावावर लावण्याची शक्यता असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणादरम्यान व्यक्त केलेली आहे. त्यामुळे हे असं घडणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केलेले आहे. यावेळी आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदीवर जोरदार निशाना साधला. केवळ चमकोगिरी केल्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अन्य कोणतेही काम नाही. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये देशातील जनतेने मोदींना घरी पाठवावे. भाजपा स्वत:ला हिंदूंचे सरकार म्हणते. पण वर्षभरात एक लाख तेरा हजार हिंदुंनी देश सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारलेले आहे. अशी टिकादेखील प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
Onion | दर आहे पण कांदाच नाही; कांद्याचे दर वधारले मात्र शेतकरी दु:खी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम