Breaking news | संसदमहारत्न सुप्रिया सुळे यांच्यासह ४६ खासदार निलंबित

0
59
Breaking news
Breaking news

Breaking news |  महाराष्ट्रातील लोकप्रिय खासदार दुसऱ्यांदा संसदरत्नाचा मान पटकावणाऱ्या सुप्रिया सुळे यांचे आज लोकसभेतून निलंबन करण्यात आले आहे. दरम्यान, काल सह आजही संसदेतून खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. आतापर्यंत तब्बल १४१ खासदारांचे हे निलंयबन करण्यात आले आहे.(Breaking news)

यामुळे मात्र विरोधी पक्ष हे प्रचंड संतापलेलेल असून, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, यांच्यासह ४९ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. शशी थरूर, डिंपल यादव, मनीष तिवारी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या विरोधी पक्षाच्या खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. काल सोमवार अ दि. १८ ) रोजी अधीर रंजन चौधरी यांच्यासह तब्बल ३३ खासदारांचे निलंबन केले होते. तसेच आजही तब्बल सुप्रिया सुळे यांच्यासह ४९ खासदारांचे सलग निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत दोन्ही सभागृहांतून तब्बल १४१ खसदारांचे निलंबन करण्यात आलेले आहे.(Breaking news)

Maratha Reservation | … तर, मराठे दिल्लीत धडकतील; थेट मोदींना इशारा

 राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार संसदरत्न सुप्रिया सुळे यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांचंही ह्या आजच्या निलंबनात समावेश आहे. या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांनाही आज निलंबित करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी कोंग्रेसच्या ह्या महत्त्वाच्या तीन खासदारांसह माला रॉय, मनीष तिवारी, चंद्रेश्वर प्रसाद, डिंपल यादव, कार्ति चिदंबरम, एसटी हसन यांचेही निलंबन करण्यात आले आहे.(Breaking news)

Parliament MP Suspended: लोकसभेपाठोपाठ आता राज्यसभेतील 45 खासदारही निलंबित, या अधिवेशनात आतापर्यंत 92 विरोधी खासदारांवर कारवाई

दरम्यान, आधी फक्त गदारोळ माजवल्यावरच खासदारांचे निलंबन केले जात होते. मात्र, आता अनेक नियम हे बदलण्यात आले असून, ह्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यानुसार ह्या खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. आता ह्या खासदारांचे निलंबन केल्यामुळे लोकसभेत विरोधक हे प्रचंड संतापले आहे.

नवीन संसद भवन इमारत आणि ह्या भवनात नवीन नियम हे लागू करण्यात आले असून, ह्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ह्या खसदारांचे निलंबन करण्यात आले आहे. लोकसभेत विरोधकांनी मोदी सरकारच्या विरोधात अनेक घोषणा द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात येत आहे. आजपर्यंत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात खसदारांचे निलंबन करण्यात आले आहे. या खासदारांना संसदेच्या आवराठी येण्यासाठीदेखील मज्जाव आहे. (Breaking news)

यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे यावेळी त्या म्हणाल्या की, ” आमची मागणीच काय आहे. जो १३ डिसेंबर रोजी संसदेवर हल्ला झाला त्यावर आम्हाला फक्त चर्चा हवी आहे. गृहमंत्र्यांनी आमच्या परक्षणांची उत्तरे द्यावी. हा सर्वांच्याच सुरक्षेचा प्रश्न आहे. याठिकाणी फक्त आमच्याच खसदारांचा नाही तर, भाजपच्याहि खसदारांच्या सूरक्षेचा प्रश्न आहे. – खासदार सुप्रिया सुळे 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here