महाराष्ट्रात जात आणि धर्म यांवरून राजकारण केले जात आहे. भोंग्यांविषयी केंद्रशासनाचा निर्णय महत्त्वाचा आहे. राजकीय वर्तुळात चांगलीच चढाओढ आपल्याला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे राज ठाकरे यांचा औरंगाबाद येथील नक्की काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाव न घेता राज ठाकरे आणि भाजपला सडेतोड उत्तर संजय राऊत यांनी दिले.
हिंदुत्वावर बोलताना पत्रकारांनी विचारले असता संजय रावतांची सडेतोड उत्तर, विरोधक म्हणजे कोण हिंदुत्वाशी यांचा संबंध काय, यांची लायकीच नाही हिंदुत्वावर बोलण्याची. हे सगळे बोगस, भंपक आणि लफंगे आहेत, असं म्हणत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपवर नाव न घेता खोचकपणे टीका केली आहे.
मराठी माणूस असेल किंवा हिंदू समाज असेल, हे सर्वजण शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, असा दावा देखील राऊतांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हीच खरी हिंदुत्वाचे खरे रक्षक संरक्षक आणि सर्वस्व आहेत हिंदू ओबीसी कोण आहेत. देश जाणतो कोण कसे कोण काय आहे. जसं मुसलमानांना त्यांचा समाजाने ओळखल, तसा हिंदू नाही समाज ओळखायला लागला. अशा शब्दात संजय रावतांनी टीका केली आहे.
________________
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम