Agriculture News | सोयाबीन उत्पादकांसाठी वाईट बातमी..

0
2

Agriculture News | सध्या राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. कारण सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सुरुवातीलाच सोयाबीनला कमी दर मिळत असल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी हे संकटात सापडले आहे. सध्या यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनला 3 हजार 800 ते 4 हजार 100 रुपयांचा प्रति क्विंटलला दर मिळतो आहे. परंतु, मिळालेल्या या दरात शेतकऱ्यांना नफा तर सोडात पण त्यांचा उत्पादन खर्चदेखील निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय.

Maharashtra | CM एकनाथ शिंदे-राहुल नार्वेकर यांच्यात बंद दाराआड चर्चा

खरीपातील नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनची लागवड करतात. नव्याने निघालेले सोयाबीन बाजार समितीत विक्रीसाठी आले असता  शुभारंभालाच 3 हजार 800 ते 4 हजार 100 रुपयांचा क्विंटलला दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या धोरणांवर संताप व्यक्त होत असून, यातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होते आहे.

Nashik | शहरातील हाय प्रोफाईल ‘रानबाजार’ उठवला; 8 कॅफे केले सील

 तेल आणि सोयाबीन ढेप आयात, दरांवर होताय परिणाम

यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी 3 लाख 80 हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झालेली आहे. मागच्या वर्षी सोयाबीनला 6 हजार रुपये क्विंटलपर्यंतचा भाव मिळाला होता. यावर्षी सुरुवातीलाच 3800 रुपये क्विंटलचा भाव मिळतो आहे. यामुळे सोयाबीनची सोंगणी करायची की नाही, असा प्रश्नही शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेला आहे. केंद्र शासनाने सोयाबीन तेल आणि डीओसी आयात करण्याचे धोरण जाहीर केलेले आहे. तेल आणि सोयाबीन ढेप आयात होत असल्याने बाजारात सोयाबीनचे दर पडलेले आहेत. पुढच्या काळात हे दर काय असतील हे सांगणे सध्या तरी अवघड आहे. दसरा-दिवाळी या सणांच्या तोंडावर महागाई कमी करताना शेतकऱ्यांच्या शेत-मालावर त्यांचे गंभीर परिणाम होत आहेत हे चित्र बाजारात पहायला मिळत आहे. यामधुन शेतकयांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here