राज्यात सध्या भोंग्याच्या वादावरून चर्चेत असणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेकरता अटींसह औरंगाबाद पोलिसांनी परवानगी दिली आहे. मनसैनिकांकडून सभेकरता जोरदार तयारी सुरू झाली आहे
1 मे रोजी औरंगाबाद या ठिकाणी होणाऱ्या राज ठाकरे यांच्या जाहीर सभेची सध्या जय्यत तयारी मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. सभा होण्यापूर्वीच आता त्याला विरोध करण्यात आलेला आहे. राज ठाकरे यांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे, अटींचे पालन न केल्यास सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीकडून देण्यात आला आहे.
राज ठाकरे यांना पोलीस प्रशासनाकडून सभेबाबत 16 अटी देण्यात आलेल्या आहेत. सभेकरता 15 हजार इतकी आसनमर्यादा ही देण्यात आलेली आहे. त्यामुळे 15 हजार पेक्षा जास्त जणांना आमंत्रित करु नये. जास्त नागरिकांना आमंत्रित करुन चेंगराचेंगरी किंवा इतर दुर्घटना घडल्यास आयोजकांना दोषी धरले जाणार असा इशारा देण्यात आला आहे. तर अटींचे उल्लंघन झाल्यास भीम आर्मीकडून महापुरुषांच्या नावाच्या घोषणा सभेच्या ठिकाणी दिल्या जातील अशी माहिती भीम आर्मीचे नेते अशोक कांबळे यांनी दिली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम