शिवसेनेच्या ताकदीचे पुन्हा महाराष्ट्राला दर्शन; वरुण सरदेसाई

0
42

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दांपत्याने मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरील हनुमान चालीसा पठण आंदोलन मागे घेतले. आज दि. २३ एप्रिल दुपारी राणा दाम्पत्यांनी मोठी घोषणा केली. तर शिवसैनिकांन मध्ये मोठा जल्लोष साजरा केला जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौ-यात विघ्न नको म्हणून ‘मातोश्री’ समोरील हनुमान चालिसा पठण आंदोलन मागे घेत आहोत, अशी माहिती रवी राणा यांनी पत्रकार परिषदेत दिली. कुणाच्याही धमक्यांना आम्ही घाबरत नाही. पंतप्रधान मोदी यांचा दौरा असून यादरम्यान कोणत्याही प्रकारचे वाद, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही आंदोनल मागे घेत आहे. आम्ही दबावाला बळी पडणार नाही. हनुमान चालिसाला विरोध करणाऱ्यांना येणा-या कळात धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. असा इशाराही रवी राणा यांनी यावेळी दिला.

यानंतर मुंबईसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा करत एकच जल्लोष केला. तसेच पेढे आणि साखर वाटण्यात आली. पंतप्रधानांच्या दौ-याचे कारण देऊन राणा दाम्पत्याने मुंबईतून पळ काढाला. शिवसेनेच्या ताकदीचे पुन्हा एकदा महाराष्ट्राला दर्शन झाले आहे, असा टोला शिवसेना नेते वरुण सरदेसाई यांनी नवनित आणि रवी राणा या दांपत्याला लगावला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here